HW News Marathi
महाराष्ट्र

“आम्हाला वाटलं थोरात, भुजबळ जेवायला बोलवतील पण…”,अजित पवारांची नाराजी

मुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या जलभूषण पुरस्कारचे काल (१३ जुले) सहयाद्री अतिथी गृह येथे वितरण करण्यात आले.यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, गुलाबराव पाटील, दत्तात्रय भरणे, संजय बनसोड इत्यादी उपस्थित होते. प्रथम पुरस्कार हा दिवंगत सुनील पोटे यांना देण्यात आला.त्यांचे नुकतेच कोरोनाने निधन झाल्याने त्यांची पत्नी मनीषा पोटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.द्वितीय पुरस्कार अनिकेत लोहिया तर तृतीय पुरस्कार प्रवीण महाजन यांना प्रदान करण्यात आला.

अजित पवारांनी दिला शंकररावांच्या आठवणींना उजाळा

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावर मिश्किल असा टोला बाळासाहेब थोरातांना लगावला. या आधी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शंकरराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा देत काही किस्से सांगितले होते. यावेळी बोलताना त्यांनी एक किस्सा सांगितला की, त्या काळात जेव्हा शरद पवारही शंकररावांच्या मंत्रिमंडळात होते. सुरुवातीला मंत्रालयाला सचिवालय म्हटलं जात होतं. मात्र, सचिवालयाला मंत्रालय म्हणण्याचं काम शंकररावांनी केलं. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, त्यावेळी ज्या दिवशी कॅबिनेट असेल त्याच्या आदल्या दिवशी जेवण असायचं. सगळे मंत्री आपल्या पत्नीसह जेवायला जायचे. याचं निमित्त असं होतं की, सगळे मंत्री एकत्र यावे, त्याला परिवारंचं एक स्वरुप येतं म्हणून तो कार्यक्रम असायचा.

माझ्याकडे जेवत असताना कोरोना नव्हता?

आम्हीही महाविकासआघाडीचं सरकार सत्तेवर आल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिलं जेवण दिल. नंतर दुसरं जेवण मी दिलं. त्यानंतर मला वाटलं तिसरं जेवण जयंतराव देतील, बाळासाहेब देतील, अशोकराव देतील, भुजबळ देतील. अजित पवार असं म्हणताच मागून बाळासाहेब थोरात म्हणाले की कोरोना आला. यावर लागलीच अजित पवार म्हणाले की, उद्धव ठाकरेंकडे जेवण असताना कोरोना होता ना, माझ्याकडे जेवण करत असताना कोरोना होता ना? अरे काही तरी पटेल असं बोलत चला, असं म्हणत त्यांनी थोरांताना मिश्लिलपणे का होईना पण दम भरलेला पाहायला मिळाला.

उद्दव ठाकरे काय म्हणाले होते?

‘बाळासाहेब थोरात यांनी कaरोनाची भीती न बाळगता आम्हाला जेवण्यासाठी बोलवावं, आम्ही तुमच्याकडे येऊन स्वबळावर जेवू, असा टोला लगावला उद्धव ठाकरेंनी लगावला. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नका नाहीतर उद्या जेवणावरुन आघाडीत बिघाडी असं व्हायचं, पण तसं काही नाही,’ असं स्पष्टीकरणही ठाकरेंनी दिलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांचा भाजपला इशारा!

News Desk

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध! – अजित पवार

Aprna

पेपर तपासणी करणाऱ्या शिक्षकांच्या मानधनात फक्त एक रूपयांची वाढ

News Desk