HW News Marathi
महाराष्ट्र

मी जे बोलतो ते खरे बोलतो आणि सांगून करतो, अजित पवारांचा भाजपला इशारा

मुंबई | महाविकास आघाडी सरकार दोन महिन्यांत पडेल, सहा महिन्यांत पडेल असे भाकीत वारंवार भाजपकडून करण्यात येत होते. पण आता वर्षानंतरही सरकार भक्कमपणे चालले आहे. आता आघाडीतील तीन पक्षातून तुमच्या पक्षात गेलेले आमदार आता येणार आहेत, त्यांच्यावर लक्ष ठेवा. पुढील चार महिन्यांत तुम्हाला ते दिसेलच. मी जे बोलतो ते खरे बोलतो आणि सांगून करतो. परत म्हणू नका तुम्ही आधी का सांगितले नाही, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधकांना दिले आहे.

काल (१५ डिसेंबर) विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. ते म्हणाले की, विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाल्याने भाजप नेते नैराश्यात आहेत.ओबीसी आरक्षणाबाबत कोणताही संभ्रम नसताना सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत पण तुम्हाला त्यात यश मिळू देणार नाही.

‘चांद्या’पासून ’बांद्या’पर्यंत महाराष्ट्र एकच आहे, त्यामुळे निधीवाटपात कोणत्याही भागावर अन्याय करण्याचा प्रश्नच नाही. कोरोना काळ कठीण होता. ही जागतिक महामारी आहे. तरीही सरकारने सावध व योग्य पावले टाकली. दरमहिन्याला राज्याला 12 हजार कोटी रुपये वेतनापोटी द्यावे लागतात. केंद्राने पैसे दिले नसतानाही कर्मचार्‍याचे वेतन दिले.

ओबीसी आरक्षणाबाबत विरोधक दिशाभूल करत आहेत. ओबीसींमध्ये इतरांना सामील करण्याची आवई उठवली जात आहे. मराठा समाजाची भीती दाखवली जात आहे. मराठा समाजालाही त्यांचे हक्क दिले जातील. मात्र, ओबीसींमध्ये त्यांचा समावेश केला जाणार नाही, याबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे. मात्र, तीन पक्ष एकत्र आल्याने विरोधक नैराश्यात गेले आहेत, असेही अजित पवार म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Bhima Koregaon Case : गंभीर गुन्हे दाखल असल्याने आरोपींना जामीन देऊ नका !

News Desk

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या वास्तववादी साहित्यामुळे… राज्यातील मानवतावाद, शोषणमुक्तीच्या लढ्याला बळ – अजित पवार

News Desk

अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर – जयंत पाटील

News Desk