HW News Marathi
महाराष्ट्र

“…म्हणूनच शरद पवार साहेबांना शेतकऱ्यांचे नेते म्हटले जाते”, अजित पवारांनी मोदींना सुनावले 

अमरावती | देशातील शेतकरी आपल्याला मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असताना त्यांच्या वाटेत खिळे ठोकले जातात. असे यापूर्वी कधीही घडले नाही. आता काय मोगलाई लागली का? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. अमरावती येथे ते पत्रकारांशी संवाद साधत होते. “केंद्र सरकार शेतकरी विरोधी भूमिका का घेत आहे हे कळायला मार्ग नाही, पण शेतकऱ्यांची अशी अडवणूक खपवून घेणार नाही,” असा इशारा देखील त्यांनी दिला. शरद पवार हे नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूनेच विचार करत आलेले आहे,म्हणूनच शरद पवार साहेबांना शेतकऱ्यांचे नेते म्हटले जाते. मात्र आताच सरकार हे शेतकऱ्यांचं ऐकून घ्यायलाही तयार नाही दिल्ली येथे शेतकऱ्यांच आंदोलन सुरू आहे सरकार त्या ठिकाणी खिळे ठोकून शेतकऱ्यांना अटकाव करत आहे ही काय देशात मोगलाई लागली काय? असा प्रतिप्रश्न अजित पवार यांनी केला आहे.

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांची वार्षिक नियोजनाची बैठक येथे पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली. “केंद्र सरकारने द्राक्ष निर्यातीचे अनुदान बंद केले. शेतकऱ्यांना मिळणारे दीड लाख रुपयांचे तसेच कंटेनरच्या भाड्याचे दोन लाख रुपयांचे अनुदान बंद केले. सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेताना दिसत आहे. आम्ही त्याचा निषेध केला आहे. शेतमालाला योग्य दर मिळावा आणि हमीभावापेक्षा कमी दर मिळत असेल, तर केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे, आपल्या मागण्यांसाठी गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची अडवणूक करण्याची सरकारची भूमिका आहे. राज्याच्या महाविकास आघाडीतील तीनही पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत आणि विविध प्रश्नांवर शेतकऱ्यांना दिलासा मिळवून देण्याचाच राज्य सरकारचा प्रयत्न राहणार आहे,” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करायला हवा होता, सोमय्यांवरील कारवाईवर फडणवीसांचे वक्तव्य!

News Desk

जिल्हा बँक निवडणुकीत तिसऱ्यांदा पराभव; राजन तेलींचा भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

Aprna

“कोण म्हणतं मुंडे भगिनी नाराज आहेत?, उगाच बदनामी करू नका”; फडणवीस भडकले

News Desk