HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवार पोहोचले कोल्हापूरात, शिरोळमध्ये पाहणी करत व्यापाऱ्यांशी केली चर्चा

कोल्हापूर | राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत पूर आला होता. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात पूरामूळे नुकसान झाले होते. दरम्यान, २ दिवसांपासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते पूर आलेल्या भागाची पाहणी करत आहेत. काल (२६ जुलै) उपमुख्यमंत्री अजित पावर कोल्हापूर, सांगली दौरा करणार होते. मात्र, खराब हवामानामुळे त्यांच्या कालचा कोल्हापूर दौरा रद्द झाला होता. त्यामुळे काल त्यांनी सांगली जिल्ह्याची पाहणी केली होती.

आज (२७ जुलै) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरमध्ये त्यांनी पूरग्रस्त शिरोळ तालुक्यात (Shirol) पाहणी करुन, शहरातील शाहूपुरी कुंभार गल्ली आणि पंचगंगा नदीवरील पुलाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफही उपस्थित होते. अजित पवारांनी शाहूपुरी आणि पंचगंगा नदीवरील पहाणी केल्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक घेतली. यानंतर पत्रकार परिषद घेऊन ते अधिक माहिती देणार आहेत.

गेल्या आठवड्यात पावसाने थैमान घातल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यातील काही भागात मोठं नुकसान झालं. अजित पवार सध्या पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. त्यांनी काल सांगली आणि साताऱ्याचा दौरा केला. कालच ते हेलिकॉप्टरने कोल्हापुरात जाणार होते. मात्र खराब हवामानामुळे अजित पवार यांनी रस्ते मार्गे सांगली आणि साताऱ्याचा दौरा केला. त्यानंतर आज ते कोल्हापुरात दाखल झाले.

शिरोळमध्ये केली पाहणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिरोळ जि. कोल्हापूर येथील जनता हायस्कूल परिसर आणि अर्जुनवाड रोड परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी केली. पूरग्रस्त ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर,खासदार धैर्यशील माने उपस्थित होते.

दोन दिवसात देणार निर्णय

राज्यात महापुरानं थैमान घातल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सांगली जिल्ह्याचा पाहणी दौरा केला. त्यावेळी त्यांनी राज्यातील प्रत्येक पूरग्रस्ताला मदतीचा हात दिला जाईल, अशी ग्वाही दिली. राज्यात 9 जिल्हे पुरामुळे बाधित झाली आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे जिल्ह्याचा थोडा भाग बाधित झाला आहे. मी सगळ्या जिल्ह्याची माहिती घेतली. याबाबत दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल, असंही अजित पवार यांनी जाहीर केलंय. ते काल सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

राष्ट्रवादीचे आमदार, खासदार एक महिन्याचं मानधन पुरग्रस्तांना देणार, अजित पवारांची घोषणा

उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. तिथली पाहणी करून त्यांनी लोकांशी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी राज्यातील प्रत्येक पूरग्रस्ताला मदतीचा हात दिला जाईल, अशी ग्वाही दिली आहे. राज्यात 9 जिल्हे पुरामुळे बाधित झाली आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे जिल्ह्याचा थोडा भाग बाधित झाला आहे. मी सगळ्या जिल्ह्याची माहिती घेतली. याबाबत दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल, असंही अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.

प्रत्येकाला मदत केली जाणार

सांगलीत पहिल्यांदा इतका जोरदार पाऊस पडला आहे. त्याचीच किंमत आपल्याला मोजावी लागली. मात्र, यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. शेतकरी, व्यापारी, मजूर यांच्या मागण्या ऐकुन घेतल्या आहेत. संकटात सापडलेल्या प्रत्येकाला मदत दिली जाईल. मुख्यमंत्री, पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री सातत्याने आढावा घेत आहेत. केंद्राकडून राज्याला मदत करण्याचं काम सुरु आहे. केंद्र आणि राज्यात चांगला समन्वय सुरु आहे. राज्य सरकार कुठेही मागे हटणार नाही. दोन दिवसांत पूरस्थितीचं चित्र स्पष्ट होईल, त्यामुळे मुख्यमंत्री आणि सर्व मिळून आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

20 वर्षानंतर गुलाबराव पाटील पहिल्यांदाच एकनाथ खडसेंच्या घरी!

News Desk

वाशिम शिवसेनेचा हायवे कॉन्ट्रॅक्ट घोटाळा गडकरींच्या पत्रामुळे उघड, भाजपचा आरोप!

News Desk

“शरद पवार राष्ट्रवादीत आहेत की शिवसेनेत हे तपासण्याची वेळ आलीये”, नाना पटोलेंचे मोठे वक्तव्य

News Desk