HW News Marathi
महाराष्ट्र

यंदाची कोजागिरी पौर्णिमा सर्वांच्या जीवनात धन, धान्य, उत्तम आरोग्याची समृद्धी घेऊन येवो – अजित पवार

मुंबई | यंदाची कोजागिरी पौर्णिमा सर्वांच्या जीवनात धन, धान्य, उत्तम आरोग्याची समृद्धी घेऊन येवो, अशा सदिच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला दिलेल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय संस्कृतीत कोजागिरी पौर्णिमेचं अध्यात्मिक, कृषीदृष्टीनं अनन्यसाधारण महत्व आहे. निसर्गाशी नातं सांगणारा हा सण आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री सर्वांनी एकत्र येत दूध पिऊन हा सण साजरा करण्याची प्रथा आहे असे शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

कोकणात भात, नाचणी, वरीसारख्या धान्याचं पूजन करुन नवान्न पौर्णिमा म्हणून हा सण साजरा होतो. कोजागिरी साजरी करण्याच्या या अनेकाविध प्रथा हे आपलं सांस्कृतिक वैभव आहे. हे वैभव टिकवण्याचा, वाढवण्याचा प्रयत्न सर्वांनी मिळून करुया. यंदाची कोजागिरी पौर्णिमा कोरोनाप्रतिबंधक नियमांचं पालन करुन, स्वत:ची, कुटुंबाची, समाजाच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन साजरी करावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हातकणंगलेचे माजी आमदार राजीव आवळे यांचा राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश…

News Desk

महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार, भाई जगतापांची घोषणा

News Desk

भागवत करडांची यात्रा सर्वात आधी मुंडेंगडावरून!

News Desk