HW News Marathi
महाराष्ट्र

अखिलेश यादव 4 फेब्रुवारीला मुंबई दौ-यावर

मुंबई | समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव 4 फेब्रुवारीला मुंबई दौर्‍यावर येत असून शीव येथे त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. शीव येथील सोमय्या मैदानावर होणार्‍या जाहीर सभेत अखिलेश राज्यातील समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संदेश देणार आहेत.

देश बचाओ, देश बनाओ या नावाने या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अखिलेश यांची सभा यशस्वी करण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी यांनी कंबर कसली असून मुंबईसह विविध ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. मुंबईसह भिवंडी, मुंब्रा व इतर ठिकाणांहून जास्तीत जास्त कार्यकर्ते सभेला आणण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी कार्यरत झाले आहेत.

या सभेच्या माध्यमातून पक्षाला नवचैतन्य देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून अखिलेश यांच्या सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहतील व अनेक नवीन कार्यकर्ते पक्षात सक्रिय होतील, असा दावा आझमी यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या आईलाही सेल्फीचा मोह’,फोटो सोशल मीडियात व्हायरल!

News Desk

पूरग्रस्तांसाठी राज्याचा केंद्राकडे ६००० कोटींच्या मदतीचा प्रस्ताव

News Desk

भाजप नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही महावितरणने लाईटबिलचा झटका दिला

News Desk
कृषी

आश्चर्य…शेळीने दिला आठ पायाच्या पिलाला जन्म

News Desk

छत्तीसगढ चार किंवा सहा पिल्लांना जन्म दिलेल्या बकऱ्या आपल्याकडे आहेत. परंतु एका शेळीने तब्बल आठ पाय असलेल्या पिल्लाला जन्म दिल्याचा आश्चर्यकारक प्रकार बलरामपूर येथे घडला आहे.

छत्तीसगढमधील बलरामपूरच्या कर्वशिला गावात हा प्रकार घडलेला असून लोकांनी याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. हे पिल्लु पाहण्यासाठी पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील लोक येथे गर्दी करीत आहेत. काही लोक याला निसर्गाचा चमत्कारही मानत आहेत. विशेष म्हणजे या करडाची प्रकृती चांगली आहे. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी हा कुठलाही चमत्कार नसून प्राण्याची वाढ होत असताना दोष निर्माण झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले आहे

Related posts

योगी म्हणतात ऊसाचे पीक घेऊ नका, डायबेटीस होईल

News Desk

गटशेती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या गटांना २०० कोटी रुपयांचा निधी

News Desk

बोंड अळी प्रादुर्भावामुळे तीन कंपन्यांवर गुन्हा दाखल

News Desk