HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच राहणार! कोरोना आढावा बैठकीत घेतला निर्णय

पुणे | एकीकडे मुंबईमध्ये शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तर दुसरीकडे कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पुण्यातील शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय आज (२२ जानेवारी) झालेल्या कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. कोरोनाबाधितांची संख्येमध्ये वाढ झाल्याने त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 

अजून आठ-एक दिवस तरी कोरोनाची आकडेवारी खाली येणार नाही. त्यात पुण्याचा कोरोना पॉझिटिव्हटी रेट हा २७ टक्के आहे. त्यामुळे अजूनतरी एक आठवडा शाळा सुरू करू नये, या विचारावर वैद्यकीय तज्ज्ञ, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, महापौर या सगळ्यांनी एका मताने निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा पुण्यातील शाळा बंद राहणार असल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. त्यांनी ट्विट करत लिहिलं, “पुण्यात सर्व शाळा-महाविद्यालये बंदच राहणार ! कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आला. पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे”, असं मोहोळ यांनी म्हंटलं आहे.

महाराष्ट्रामध्ये जरी कोरोनारुग्ण संख्येत वाढ होत असेल तरी मुंबईमध्ये कोरोना रुग्णाच्या संख्येत घट होत आहे. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईमध्ये १ ली ते १२ वी पर्यंतच्या शाळा येत्या सोमवारपासून सुरु करण्यात येणार आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी पत्रकार परिषदमध्ये सांगितलं की मुलांच्या सुरक्षेची खबरदारी घेण्यात येईल, तसेच सोशल डिस्टनसिंगचं पालन केलं जाईल. त्याचबरोबर ज्या मुलांचे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत अश्या मुलांना ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण दिलं जाणार आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्राच्या EWS आरक्षणामध्ये राज्य सरकारला बद्दल करता येणार नाही – गुणरत्न सदावर्ते

News Desk

गीता वाटण्याऐवजी निकाल वेळेवर लावा | उद्धव ठाकरे

News Desk

अमित शहांचे विमानतळावर स्वागत, कलम ३७० रद्द केल्याबद्दल ३७० तोफांची सलामी

News Desk