HW News Marathi
महाराष्ट्र

गीता वाटण्याऐवजी निकाल वेळेवर लावा | उद्धव ठाकरे

पुणे | मुंबईतील महाविद्यालयात गीता वाटण्याऐवजी विद्यापीठाचे निकाल वेळेवर लावावे, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर आरोप केला आहे. उद्धव ठाकरे हे सध्या पुण्याच्या दौऱ्यावर शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक घेऊन ठाकरेंनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी तावडेंसह भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर नाशाणा साधला. विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे निकालचा गोंधळ टाळण्यासाठी गीता वाटपाचा कार्यक्रम भाजपने सुरू केला असल्याचे यावेळी ठाकरे म्हटले आहे.

मोदी सरकारने ज्याप्रमाणे एक क्षणात नोटाबंदी केली. त्याचप्रमाणे ‘राम मंदिर’ का नाही होऊ शकत ? आणि राम मंदिर समान नागरी कायदा, ३७० कलम रद्द करणे या सगळ्या गोष्टी आतापर्यंत का नाही झाल्या ? असे सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

पावसाळ्यात खड्ड्यांची जबाबदारी सगळ्यांची असल्याचे सांगून उद्धव ठाकरेंनी मुंबईतील खड्ड्यांच्या प्रश्नाला बगल दिली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्प लादणार नाही, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे काहीही झाले तरी नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका उद्धव ठाकरेंनी यावेळी मांडली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांचा भाजप सदस्यत्वाचा राजीनामा, राष्ट्रवादीत प्रवेशाची शक्यता

News Desk

पूरग्रस्त भागात वीज बिल वसूली करु नका, उर्जामंत्री नितीन राऊतांचे आदेश

News Desk

लातूरच्या पाण्यासाठी आमिरने केले श्रमदान

News Desk