HW News Marathi
देश / विदेश

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा

नवी दिल्ली | महाराष्ट्रात पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांत पुरस्थिती निर्माण झाली आहे. अशात महाराष्ट्रातील या स्थितीचा केंद्राने आढावा घेतला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री अद्धव ठाकरे यांना फोन करत विचारपूस केली होती. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मुख्यमंत्र्यांशी बातचीत केली आहे.

कोकणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसंच पावसाचाही हाहाकार पाहण्यास मिळतो आहे. चिपळूण, रायगड, महाड या ठिकाणची स्थिती चिंताजनक आहे. रायगड जिल्ह्यातलं तळये गाव हे तर भूस्खलन झाल्याने वाहून गेलं आहे. या ठिकाणी आत्तापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. निसर्गाचा कहर अशा प्रकारे बघायला मिळतो आहे. अशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे.

काय म्हणाले अमित शहा?

महाराष्ट्रातील रायगडमध्ये पावसाचा कहर आणि भूस्खलन यामुळे झालेली दुर्घटना ही अत्यंत दुःखद आहे. यासंबंधी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. तसंच DG NDRF लाही संपर्क साधला. NDRF ची पथकं मदत आणि बचाकार्य करत आहेत. केंद्र सरकार या ठिकाणी संकटात सापडलेल्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे.

अमित शाह यांनी त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट करत हा संदेश लिहिला आहे. गुरूवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली. यावेळीही त्यांनी महाराष्ट्रातल्या पावसाची स्थिती आणि कुठे काय नुकसान झालं आहे त्याची माहिती घेतली. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनही दिलं. आत आज केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता आणि महाराष्ट्रात पुरात अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी आम्ही सहकार्य करू तसंच आम्ही महाराष्ट्रासोबत आहोत असं सांगत दिलासा दिला.

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना पंतप्रधानांकडून २ लाखांची मदत जाहीर!

कोकणात अतिवृष्टीच्या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नेते पीडितांना मदत करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानांचा राष्ट्रीय मदत निधी अंतर्गत २ लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. कोकणात ३ दिवस जोरदार पाऊस सुरु आहे, ज्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर

नरेंद्रा मोदींनी त्यांच्या ट्विटर अकाउंटद्वारे मदतीची माहिती दिली आहे. ‘महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे मृत्यु पावलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून 2 लाख रुपये सानुग्रह मदत तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर’, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राफेल, राम मंदिर, कावेरीवरून संसदेत गदारोळ

News Desk

नासाने एकादशी दिवशी उपग्रह सोडला म्हणून यशस्वी !

News Desk

कृषी कायद्यावरुन आता सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला घेतलं फैलावर, लवकर निर्णय द्या नाहीतर…

News Desk