HW News Marathi
महाराष्ट्र

बंद दाराआड झालेल्या चर्चा शाहांनी पंतप्रधान मोदींना सांगितल्या नाही !

मुंबई | लिलावती रुग्णलायतून डिस्जार्च मिळाल्यानंतर पुन्हा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मौनावर आज (१४ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेतून तोफ डागली केली. “बाळासाहेबांच्या खोलीमध्ये अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात मुख्यमंत्री आणि सत्तेचे समान वाटप असा युतीचा फॉर्म्युला बंद दाराआड चर्चा झाली होती. मात्र, शाहांनी बंद दाराआड झालेल्या चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितल्या नाहीत,” असा दावा राऊतांनी केला आहे. म्हणून सर्व गोष्टी बिघडल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.

राऊत पुढे म्हणाले की, “बाळासाहेबांच्या खोलीमध्ये मुख्यमंत्री पद आणि सत्तेच्या समसमान वाटपाचा फॉर्म्युला ठरला होता, भाजपसाठी ती केवळ एक खोलीच असेल. मात्र, ही शिवसैनिकांसाठी मंदिरासारखी आहे. हे मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, “असे संजय राऊत म्हणाले.

आता बंद खोलीमधील चर्चा बाहेर कशा आल्या अशी विचारणा भाजपवाले करत आहेत. मात्र, बंद खोलीतल्या चर्चा बाहेर का आल्या. तुम्ही ती चर्चा आणि ठरलेली गोष्ट मान्य केली असती तर बंद खोलीत झालेली चर्चा बाहेर आली नसती. बंद दाराआड झालेल्या चर्चेचा विषय हा दिल्या घेतल्या शब्दाचा आणि वचनाचा होता. महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा होता. स्वाभिमानाचा होता, असेही संजय राऊत म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली; ‘या’ तारखेला मुंबईत होणार अधिवेशन

News Desk

पंकजा मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

News Desk

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर होण्याच्या प्रयत्नांना पाठबळ देणारा अर्थसंकल्प! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna