HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीसांचे राजकारण इतके खुनशी असेल असे वाटले नव्हते – अमोल मिटकरी

मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ कडेस यांनी भाजपला रामराम केल्याचा धक्का सगळ्यांना बसला. “एकनाथ खडसेंनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर मांडलेले मुद्दे ऐकून धक्का बसला. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण इतकं खुनशी असेल याची यापूर्वी कधी कल्पना केली नव्हती” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे.

“देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण इतकं खुनशी असेल, याची यापूर्वी कधी कल्पना केली नव्हती. आज एकनाथ खडसे साहेबांनी अंतःकरणपूर्वक जे मुद्दे पत्रकार परिषदेत मांडले ते ऐकून धक्का बसला. चार दशकं ज्यांनी पक्ष वाढवला त्या नेत्यांना असा त्रास? केंद्राने गंभीर दखल घ्यावी” अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरींनी दिली आहे.

अबीर, गुलाल, उधळीत रंग l “नाथा ” घरी नाचे माझा सखा पांडुरंग ll राष्ट्रवादी पक्षात एका मजबूत नेतृत्वाचे एक कार्यकर्ता म्हणून मनःपूर्वक स्वागत.. (अनेक अहंकारी नेते पुन्हा तोंडावर आपटले. ईश्वर त्यांना सावरण्याचे बळ देवो )” असे ट्वीट मिटकरी यांनी याआधी केले होते. त्यामुळे भाजपला नक्कीच खडसेंच्या राजीनाम्याने धक्का बसला आहेच.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Maharashtra Budget 2021-22 : राज्य सरकारची मोठी घोषणा, ३ लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के दराने

News Desk

उल्हास बापट यांनी केलं अजित पवारांच्या वक्तव्याचं खंडण, १२ आमदारांबद्दल स्पष्टोक्ती !

News Desk

जिथे पॉझिटिव्हीटी रेट जास्त तिथे लसीकरण वाढवण्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपेंचें आदेश!

News Desk