HW News Marathi
महाराष्ट्र

नवनीत राणानी न्यायालयाने घातलेल्या अटीचे उल्लंघन,  सरकारी वकील न्यायालयात जाणार?

मुंबई। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काल लिलावात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. “मुख्यमंत्र्यांनी लोकांमध्ये जावून निवडणूक लढवावी. त्यानी कोणाताही मतदारसंघ निवडावा आणि तिथे मी त्यांच्याविरोधात उभी राहीन. नारी शक्ती काय आहे ते त्यांना दाखवून देईन,” असे थेट आव्हान नवनीत राणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (८मे) माध्यमांशी बोलताना केले. परंतु, राणा दाम्पत्यांना जामीन देता मुंबई सत्र न्यायालयाने काही अटी घातल्या होत्या. त्यापैकी एक माध्यमांना प्रतिक्रिया देणे किंवा मुलाखत देण्यास मनाई केली होती. तरी देखील नवनीत राणांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या पार्श्वभूमीवर सरकारी वकील प्रदीप घरत हे आज (९ मे) न्यायालयात धाव घेणार आहेत.

दरम्यान, सरकारी वकील प्रदीप घरत हे न्यायालयात जावून राणा दाम्पत्यांनी न्यायालयाने घातलेल्या अटीचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांचा जामीन रद्द करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच न्यायालयाने जामीन मंजूर करताना राणा दाम्पत्यांना पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेला वेठीस धरू नये, पोलिसांना सहकार्य करणे, पुराव्यांशी छेडछाड करून नये आणि माध्यमांना प्रतिक्रिया देणे किंवा मुलाखत देण्यास मनाई या अटी शर्तीवर त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

माध्यमांशी नवनीत राणा काय म्हणाल्या

मुख्यमंत्र्यांनी लोकांमध्ये जावून निवडणूक लढवावी. त्यानी कोणाताही मतदारसंघ निवडावा आणि तिथे मी त्यांच्याविरोधात उभी राहीन. नारी शक्ती काय आहे ते त्यांना दाखवून देईन. मग, तेव्हा आपण प्रामाणिकपणा आणि मेहनतीसमोर कोण निवडून येते ते कळेल. जर दम असेल तुम्ही तुमच्या पुरवजांच्या नावाने तुम्हाला आज मुख्यमंत्री पद मिळाले. पण, तुम्ही जनतेसमोर येवून तुम्ही लढवून दाखवा. तुमच्या समोर महिला ताकदीने कशी उभी राहते. हे मी त्यांना दाखवून देते. आणि येत्या काळात मी त्यांना चेतावणी देते की त्यांनी निवडणूक लढवावी आणि त्यांच्यासमोर एक महिला निवडणूक लढवून दाखवते. महाराष्ट्रची जनता ज्या पद्धतीने राम आणि हनुमान चालिसाच्या नावावर त्यांनी माझ्यावर अत्याचार केले आहेत. माझ्यावर झालेल्या अत्याचाराचे उत्तर महाराष्ट्राची जनता देईल. रामाचे आणि हनुमानचे नाव घेऊन मी कोणतीच चुक केली. मुख्यमंत्र्यांना वाटते हे जर चूक असेल म्हणून त्यांनी मला १४ दिवास त्यांनी मला तुरुंगात ठेवले. मी त्यांना सांगू इच्छिते, जर देवाचे, श्री राम आणि हनुमानाचे नाव घेणे किंवा त्यांचे पठण करणे चुकीचे असेल. तर मला १४ दिवस मला थांबू शकत नाही. १४ वर्षही मला तरुंगात टाकले तरी मी तयार आहे. मी तेवढ्याच ताकतीने उभी राहीन, मला कोणी दाबण्याचा प्रयत्न करू नये.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटीची मदत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

News Desk

Jay Ajit Pawar Exclusive : युवकांच्या मदतीसाठी राजकारणात येईन !

News Desk

दोनो रणजीत है,अटल अभी जीत है

News Desk