HW News Marathi
महाराष्ट्र

कंगणासाठी आता अमृता फडणवीस मैदानात ! अमृता वहिनी म्हणतात…

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत सध्या मुंबईची तुलना पाकिस्तानसोबत केल्यामूळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणातील तपासावरून राज्य सरकारवर, मुंबई पोलिसांवर आरोप करणाऱ्या कंगणाला सर्व स्तरांतून टीका केली जात आहे. कायमच वादग्रस्त विधान करणाऱ्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही या वादात उडी घेतली आहे.

अमृता फडणवीस यांनी एक ट्वीट करत कंगनाला ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले आहे. ‘एखाद्याच्या मताशी आपण सहमत नसूही, पण लोकशाहीमध्ये व्यक्त होण्याच्या अधिकाराचे आपण रक्षण केले पाहिजे. भाषणाचे स्वातंत्र्य, विश्वास स्वातंत्र्य, चळवळीचे स्वातंत्र्य, प्रेस-स्वातंत्र्य कोणी दडपू शकत नाही. एखाद्याच्या मताविषयी प्रतिवाद असू शकतो, पण टीका करणाऱ्याच्या पोस्टरला चप्पलेने मारणे हे योग्य नाही,’ असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त करत कंगणाचे एकाअर्थी समर्थनच केले आहे.आता अमृता फडणवीस यांनी या वादात उडी घेतल्याने नवे वळण येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या आधी अमृता फडणवीस यांनी देखील मुंबई आणि मुंबई पोलिसांविरु्ध ट्विट केले होते.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आता मुंबई सामान्य माणसांसाठी राहायला सुरक्षित नाही असे म्हटले होते.‘ज्या पद्धतीने सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येचे प्रकरण सांभाळले जात आहे त्यानुसार सामान्य माणसांसाठी मुंबईत राहणे सुरक्षित राहिले नाही आहे आणि माणुसकी गमावली आहे’, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटेंचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन  

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अख्खा मेंदू राज्यात आहे, प्रकाश आंबेडकरांची खोचक टीका

News Desk

आणि…आम्ही तीन होणार ! विरुष्काच्या घरी येणार छोटा पाहुणा

News Desk