HW News Marathi
महाराष्ट्र

“बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा!” अमृता फडणवीसांचा राज्य सरकारवर रोख

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना अटक केल्यानंतर भाजपाने ठाकरे सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील एक ट्वीट केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक शेर ट्विट करून अर्णब गोस्वामी यांचं कौतुक केलं आहे. “बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा!” असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “आणीबाणी १९७७ मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम! आणीबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे” असं म्हटलं आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BMC शिवसेनेकडे आहे, ही हुकूमशाही चांगली नाही – नवनीत राणा

News Desk

कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा

Aprna

बंद आणि विरोध यांचा ‘धंदा’; त्यावरच गोळा होतो ‘चंदा’! – शेलार

News Desk