HW News Marathi
महाराष्ट्र

बऱ्याच गोष्टी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते, अमृता फडणवीसांचा हिंदुत्वाच्या मुद्यावरुन टोला

मुंबई | राज्यातील मंदिेरे पुन्हा सुरु करण्यावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात या मुद्द्यावरुन पत्राद्वारे वाद सुरु आहे. अनेक राजकीय पक्षांनी याविरोधात आपली मते मांडत विरोध केला असून आता यात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनीही उडी घेतली आहे. दारुची दुकानं सुरु आहेत, मग मंदिरं काय धोकादायक क्षेत्रात आहेत का? असा सवाल अमृता फडणवीसांनी उपस्थित केला आहे.

“वाह प्रशासन! महाराष्ट्रात दारुची दुकानं, शॉप्स सगळीकडे सुरु झाली. मग मंदिरं काय धोकादायक क्षेत्रामध्ये आहेत का? अनेकदा असं होतं की बऱ्याच गोष्टी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते!” असे ट्विट अमृता फडणवीसांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधल्यानंतर याच्या प्रतिक्रिया काय येणार हे पाहणे गरजेचे असणार आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम दोन वर्षात पूर्ण करणे शक्य !

swarit

राहुल गांधींविरोधात दापोलीतून तालुक्यातून याचिका दाखल!

News Desk

“आरक्षणाच्या विरोधात कोण आहे हे ओबीसी समाजाला समजले आहे”,धनंजय मुंडेंचा भाजपवर वार

News Desk