HW News Marathi
महाराष्ट्र

ठाकरे सरकारला अमृता फडणवीस यांचा खोचक टोला !

मुंबई | मुंबईकरांसाठी आठवड्यांच्या पहिला दिवस हा गोंधळाचा असतोच. कधी ट्रॅफीकच लागते तर कधी ट्रेन उशीराने धावत असतात. मात्र, आजचा दिवस हा पुर्ण मुंबई अंधारल्याने ठप्प झाला.पॉवर फेल्युअरमुळे सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती मिळाली.

यावरून भाजपने सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली. नेहमीच मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार यांच्यावर टीका करणाऱ्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी वीज खंडीत झाल्यामुळे निशाणा साधला आहे. Power लोकांना भ्रष्ट करत नाही तर लोक Power ला भ्रष्ट करतात ! असे सुचक ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे शिवसेनेकडून किंवा आघाडी सरकारकडून त्यांना काय उत्तर मिळते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

बेस्टने यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिली होती. टाटाकडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे बेस्टने म्हटलं. मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला. या संदर्भातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात दोन तासांनी यश आलं असून दुपारी बारा वाजल्यापासून टप्प्या टप्प्यांमध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

येत्या २६ फेब्रुवारीला मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे आमरण उपोषण करणार

Aprna

ओबीसी आरक्षणासाठी जूनमध्ये बांठिया समितीचा अहवाल मांडणार! – अजित पवार

Aprna

कृषी कायद्यात बदल होणं आवश्यक, दुरुस्ती विधेयक मांडा!

News Desk