HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्राच्या मुळावर असे आंडू-पांडू खुप आले,आम्ही त्यांना धडा शिकवू,संजय राऊत भिडेंवर भडकले !

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढतेय.एकीकडे राज्यात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.मात्र दुसरीकडे संभाजी भिडे यांनी एक अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलें.कोरोनाने मरणारी माणसं जगण्याच्याच लायकीची नाहीत. कोरोना हा मूळात रोगच नाही. त्यामुळे त्यावरुन सुरु असलेला लॉकडाऊनचा बावळटपणा सरकारने बंद करावा,असं मत संभाजी भिडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. त्यानंतर, अजित पवारांनीसुद्धा भिडेंच्या वक्तव्याचा निषेध करत कारवाईचे संकेत दिले आहेत. संभाजी भिडेंच्या वक्तव्यावरुन अनेकांनी संताप व्यक्त केला. संभाजी भिडेंच्या या वक्तव्याचा खासदार संजय राऊत यांनीही चांगलाचं समाचार घेतला आहे.

संजय राऊत काय म्हणाले ?

संजय राऊत म्हणाले ,भारतीय जनता पक्षाचे एक विचारक आहेत, त्यांनी कोरोनाने मरणाऱ्या लोकांबद्दल अपशब्द वापरले आहेत. आम्ही तुम्हाला दाखवून देऊ आम्ही कोण आहोत, महाराष्ट्राच्या मुळावर असे आंडू-पांडू खूप येऊन गेले. महाराष्ट्राने अशा आंडू-पांडूंना धडा शिकवलाय, अशा शब्दात राऊत यांनी संभाजी भिडेंवर टीका केली. आतासुद्धा शिवसेना म्हणून, महाराष्ट्र म्हणून सगळ्यांनी एकत्र यायचं ठरवलं. तर, पळता भूई थोडी होईल, असे राऊत यांनी म्हटले.

संभाजी भिडे काय म्हणाले होते

“कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे. काही गरज नाही मास्क लावण्याची, हा सगळा मूर्खपणा आहे”, असं संभाजी भिडे म्हणाले. ते सांगलीत बोलत होते. हातावरची माणसं उद्ध्वस्त होत आहेत. शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त झाले आहे. लॉकडाऊनची गरज नाही. व्यसने वाढवायची, गांजा अफू दारु दुकाने वाढवायचं काम सुरु आहे, असं संभाजी भिडे म्हणाले. कोरोनाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबाबदार आहेत, असं ते म्हणाले.

“मुळात कोरोना हा रोग नाही आणि कोरोनामुळे जी माणसं मरतात ती जगायच्या लायक नाहीत. तो मानसिक आजार आहे,” असं अजब वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. तसंच कोरोना निर्बंधांवरुन त्यांनी राज्य सरकारवर गंभीर टीकाही केली आहे. सामान्य नागरिकांनी सरकारविरोधात बंड करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. संभाजी भिडे म्हणाले की, “समाजाचा संसार चालवण्यासाठी शासन आहे. मात्र शासन हे दुशासन होता कामा नये, निव्वळ मूर्खपणा सुरु आहे. शासनाचे निर्णय घातकी आहेत. संसार आणि व्यापारी माती मोल झाले. लॉकडाऊनचा निर्णय घेणाऱ्या शासनकर्त्यांना कवडीमोल अक्कल नाही.”

“लॉकडाऊनमध्ये खासदार आणि आमदारांचे पगार सुरू आहेत, त्यांचे पगार परत घेऊन, सरकारी खजिन्यात जमा करावेत. सामान्य माणसांची उपासमार सुरु आहे. त्यामुळे लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. सामान्य माणसांचा विचार नसलेले राज्यकर्ते राज्यापासून संपूर्ण देशात आहेत, असलं सरकार फेकून दिल पाहिजे,” असंही संभाजी भिडे म्हणाले.

“कोरोना हा रोगच नाही. दारु दुकाने उघडी आणि भाजी विकणाऱ्यांना पोलीस काठ्या मारतात,” असं भिडे गुरुजी म्हणाले. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्यात सुरु असलेल्या परिस्थितीला केंद्र आणि राज्य सरकारही जबाबदार आहे. कोरोनाच्या बाबतीत देशात खेळखंडोबा चालू आहे, जे जगायचे ते जगातील जे मरायचे ते मरतील, असं असंवेदनशील वक्तव्य त्यांनी केलं. तसंच मिलिट्रीला आपण काय मास्क लावून लढायला सांगणार आहोत का? असा सवाल त्यांनी विचारला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये

News Desk

८२ वर्षाच्या पार्ले -जी बिस्किटाने लॉकडाऊनच्या काळात केली विक्रमी नोंद

News Desk

#Coronavirus : पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या ११३९ वर

News Desk