HW News Marathi
Covid-19

भितीदायक! राज्यात आज सर्वाधिक ५०२४ कोरोना रुग्णांची नोंद

मुंबई। महाराष्ट्र कोरोना रुग्णांची संख्या ही आधीपेक्षा झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यात आज (२६ जून) एका दिवसातील सर्वाधिक विक्रमी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज ५ हजार २४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात काल (२५ जून) देखील ४ हजार ८४१ रुग्णांची नोंद झाली होती. राज्यात आज तब्बल १ हजाराने रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या राज्यात ६५ हजार ८२९ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत.आज २३६२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ७९ हजार ८१५ झाली आहे.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.२५ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख ७१ हजार ८७५ नमुन्यांपैकी १ लाख ५२ हजार ७६५ नमुने पॉझिटिव्ह (१७.५२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ५८ हजार ४८८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ९०३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १७५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ९१ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८४ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.६५ टक्के एवढा आहे.

मागील ४८ तासात झालेले ९१ मृत्यू हे मुंबई मनपा-४४, कल्याण-डोंबिवली मनपा-२, नाशिक-१. नाशिक मनपा-७, पुणे मनपा-१४, कोल्हापूर-१, औरंगाबाद मनपा-१४, लातूर-२, नांदेड मनपा-२, अकोला-१, अकोला मनपा-१, नागपूर मनपा-१, गोंदिया-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चांगले काम करणारे सगळे भाजपचे असतात, असा शिवसेनेचा विश्वास !

News Desk

Weekend Lockdown मध्ये आमदार रवी राणांकडून नियमांचे उल्लंघन, उद्घाटन कार्यक्रमाला तोबा गर्दी

News Desk

वरळी कोळीवाडा कंटेनमेंट झोनमुक्त होणार

News Desk