HW News Marathi
महाराष्ट्र

आणि राज्याचे गृहमंत्रीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव विसरले!

मुंबई | मुंबई पोलिस स्कॉटलँड पोलिसांच्या दर्जाची समजली जाते, ज्यांना मुंबईत राहणे सुरक्षित नाही असे वाटते त्यांना मुंबई किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, ज्या कुणी कलाकाराने हे वक्तव्य केले, त्याचा आम्ही निषेध करतो अशी प्रतिक्रिया करणारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाच हिंहूस्थानाचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव एका मुलाखती दरम्यान आठवले नाही.

अभिनेत्री कंगना राणावतला खड्डे बोल सुणावणाऱ्या गृहमंत्र्यांनाच संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव विसरल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरुन अनिल देशमूखांवर टिका केली जात आहे. दरम्यान, हार्दिक सूचक यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. तर, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घ्यायला महाराष्ट्रात कोणी विसरू शकत नाही पण दुर्दैवाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना छत्रपती शिवरायांचे नाव आठवून पण घेता आल नाही’ ? अस देखील ते या ट्विट मध्ये म्हणत आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आम्ही १६२’ ! महाविकासआघाडीचे सर्व आमदारांची पहिल्यांदा ‘परेड’

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज घेतले पाच महत्त्वाचे निर्णय

News Desk

मुख्यमंत्रीपदाचा म्हणा किंवा समसमान पदवाटपाचा ‘पेच’ पडला आहे हे नक्की!

News Desk