HW News Marathi
महाराष्ट्र

जळगाव वसतिगृह महिला शोषण प्रकरणी गृहमंत्र्यांनी दिली पोलिसांना क्लीन चिट

मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याचा मुद्दा काल (३ मार्च) चांगलाच गाजला. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी निवेदन सादर करत सहा महिला अधिकाऱ्यांनी सादर केलेला अहवाल पटलावर मांडला. अनिल देशमुख यांनी यावेळी महिलांचं वसतिगृह असल्याने तिथे पोलीस कर्मचारी जाऊ शकत नसल्याचं सांगत, पोलिसांवरील आरोपात तथ्य नसल्याची माहिती दिली आहे.

जळगाव महिला शासकीय वसतीगृहामध्ये महिलांचे शोषण झाल्याचा आरोपाचे प्रकरण आजच्या दिवशीही सभागृहात गाजले. मुलींना नग्न नाचवल्या प्रकरणावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये घमासान पाहण्यास मिळालं. योग्य ती कारवाई केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी केली होती. दरम्यान आज या प्रकरणी गृहमंत्र्यांनी क्लीन चीट दिली आहे. ज्या महिलेने तक्रार केली आहे, ती वेडसर असल्याची तक्रार याआधी समोर आल्याचं गृहमंत्री म्हणाले.

“वसतिगृहात काही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले होते त्यात गरबा, कविता वाचन, गाण्याचा कार्यक्रम होता. महिला अधिकाऱ्यांनी तिथे भेट देऊन सर्व कामकाज पाहिलं, महिलांशी चर्चा केली. महिलांचं वसतिगृह असल्याने एकही पोलीस कर्मचारी तिथे आत जाऊ शकत नाही. तेथील रजिस्टरमध्ये कोणी अधिकारी कधी आतमध्ये आल्याची नोंद नाही. त्यामुळे अशा पद्धतीने व्हिडीओ झाला, नग्न व्हायला लावलं आणि पोलिसांनी व्हिडीओ काढला यामध्ये काही तथ्य नाही. तशा पद्धतीचा अहवाल महिला अधिकाऱ्यांन दिला असून तो मी पटलावर ठेवतो,” असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

या प्रकरणी 6 अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली होती. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी निवेदन सादर केले. त्यांनी महिला अधिकाऱ्यांनी सादर केलेला अहवाल पटलावर मांडला. ज्या वसतीगृहामध्ये हा प्रकार घडला त्याठिकाणी 41 महिलांची साक्ष नोंदवण्यात आली. दरम्यान या तक्रारीमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं गृहमंत्री म्हणाले. त्यांनी अशी माहिती दिली की, तिच्या पतीनेही याआधी त्या महिलेविरोधात तक्रार केली होती. शिवाय त्याठिकाणी पोलीस हजर असल्याचा आरोपही गृहमंत्र्यांनी फेटाळला आहे. पोलिसांनी व्हिडीओ काढला यात काही तथ्य नसल्याचे गृहमंत्री म्हणाले.

यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी करोना काळात असे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास कोणी परवानगी दिली? अशी विचारणा केली. त्यावर उत्तर देताना अनिल देशमुख यांनी सांगितलं की, “१७ महिलांना कविता म्हणण्याचं, गाणी गाण्याचं बंधन नाही. तिथे फक्त १७ महिला होत्या”. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी यावेळी १७ पैकी पाच मुली १८ वर्षाच्या खालील असूनदेखील त्या गर्भवती असल्याने बालसुधारगृहात पाठवण्यात आल्याची बातमी खरी आहे का ? अशी विचारणा केली. यावर अनिल देशमुख यांनी हे वृत्त चुकीचं असून हे मुलींचं नाही तर महिलांचं वसतिगृह असल्याची माहिती दिली. तसंच ज्या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे त्यांच्यावर कारवाई करु असंही त्यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीत गेलेले पारनेरचे शिवसेनेचे नगरसेवक स्वगृही परतले !

News Desk

अनिल देशमुखांविरोधात आरोपपत्र दाखल!

News Desk

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी बुथ कमिट्या सक्षम करा ! | नाना पटोले

News Desk