HW News Marathi
महाराष्ट्र

परमबीर सिंग यांच्या त्या आरोपासाठी अनिल देशमुखांची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर भष्च्राचाराचे गंभीर आरोप केले. या आरोपांप्रकरणी गृहमंत्र्यांची चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात आदेश दिले आहेत.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्रात १०० कोटींच्या खंडणी वसुलीचे आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केले आहेत. यावर चौकशी व्हावी अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली होती. आता यासंदर्भात अनिल देशमुख यांनी माहिती दिली आहे.

आपल्या मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी जे आरोप केले होते त्या प्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी मान्य केली आहे. या प्रकरणी हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांद्वारे चौकशी करण्यात येणार आहे, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. आज (२८ मार्च) प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

अनिल देशमुखांकडे गृहमंत्रीपद अपघाताने – सामना (रोखठोक सदर)

देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा आणि रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळय़ात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो.

अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणे बरे नाही. ‘सौ सोनार की एक लोहार की’ असे वर्तन गृहमंत्र्यांचे असायला हवे. पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो हे विसरून कसे चालेल? असा सवालही सामनातून करण्यात आला आहे.

परमबीर सिंगांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा दावा केला आहे. या पत्रात परमबीर सिंग म्हणतात, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं. महिन्याला इतकी मोठी रक्कम बार, रेस्टॉरंट आणि अन्य संस्थांकडून वसुली करायची होती.

अनिल देशमुख बदलीबद्दल काय म्हणाले होते?

दरम्यान, सचिन वाझे प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि दहशतवाद विरोधी पथकाच्या चौकशीतून काही गोष्टी पुढे आल्या आहेत. या बाबी माफ करण्यासारख्या नाही आहेत. त्यामुळे चौकशीत बाधा येऊ नये यासाठीच मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली आहे. ही नियमित प्रशासकीय बदली नाही, अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अँटिलिया स्फोटक प्रकरणी पोलिसांकडून चुका झाल्याची स्पष्ट कबुली दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना खासदार संजय राऊत उद्या दिल्लीला जाणार 

News Desk

“अदार पूनावालांनी मागितली नसून त्यांना सुरक्षा कशासाठी?,” नाना पटोलेंचा मोदी सरकारला सवाल

News Desk

संघ पद्धतीवर नख लावण्याचं काम केलात तर खपवून घेतलं जाणार नाही भाजपचा इशारा!

News Desk