HW News Marathi
महाराष्ट्र

सरकारमध्ये आवश्यक महत्त्व मिळत नसल्याने काँग्रेस नेते नाराज, बोलावली तातडीची बैठक

मुंबई । महाराष्ट्रातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महाविकासआघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याच्या जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. महाविकासआघाडी सरकारमधील काँग्रेस नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज (११ जून) काँग्रेसच्या सर्व नेत्यांची बैठक बोलावण्यात आली. दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या घरी ही बैठक बोलावण्यात आली असून महाविकासआघाडी सरकारमधील काँग्रेसच्या भूमिकेबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. सरकारमध्ये काँग्रेसच्या मंत्र्यांना, नेत्यांना आवश्यक ते महत्त्व मिळत नसल्याबाबत ही नाराजी असल्याचे समजते.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्र काँग्रेसबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. “महाविकासआघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे नेते निर्णायक भूमिका वा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकत नाहीत. सरकारला पाठिंबा देण्यात आणि सरकार चालवण्यात मोठा फरक आहे”, असे राहुल गांधींनी म्हटले होते. त्यामुळे, काँग्रेसला राज्य सरकारमध्ये महत्त्व नाहीये, अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. याच कारणामुळे, गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मोठी नाराजी असलेली पाहायला मिळत आहे. म्हणून आज काँग्रेसच्या नेत्यांची ही तातडीची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती मिळते.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या तुलनेत काँग्रेसच्या नेत्यांना तसेच मंत्र्यांना आवश्यक ते महत्त्व मिळत नसल्याने महाराष्ट्र काँग्रेसमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अंतर्गत धुसफूस असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याचप्रमाणे, अधिकारी वर्गावर देखील काँग्रेसचे मंत्री नाराज असल्याचे म्हटले जात आहे. अनेकदा मंत्र्यांना न विचारता अधिकारी वर्गाकडून परस्पर निर्णय घेतले गेल्याने काँग्रेसचे मंत्री नाराज असल्याचे म्हटले जात आहे. मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि मंत्र्यांमध्ये यामुळे वाद निर्माण झाल्याची माहिती मिळते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेचे काम प्रत्यक्ष भेट देऊन पाहणार; काम गतीने पण दर्जेदार करा”, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

News Desk

“मी कधीच माघार घेत नाही”, जितेंद्र आव्हाडांची ठाम भूमिका

Aprna

भाजप, व्यापारी संघटनांनंतर मनसेचाही महाराष्ट्र बंदला विरोध

News Desk