HW News Marathi
महाराष्ट्र

‘देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला बिलकूल दाद दिली नाही’, अन्वय नाईक कुटुंबीयांचा आरोप

मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरुन गदारोळ घालण्यात आल्यानंतर सत्ताधारी नेत्यांकडून अन्वय नाईक प्रकऱणाचा उल्लेख करण्यात आला. यामुळे पुन्हा एकदा अन्वय नाईक प्रकरण चर्चेत आलं असून फडणवीसांनी अन्वय नाईक प्रकरण दाबलं असा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. यानंतर फडणवीसांनी सुप्रीम कोर्टाचा दाखला देत गृहमंत्र्यांविरोधात हक्कभंग दाखल केला आहे. या सर्व घडामोडींदरम्यान अन्वय नाईक कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षाकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला आहे.

फक्त श्रीमंतानाच न्याय मिळणार का? अशी विचारणा अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईकने केली. “सुप्रीम कोर्टाचा निकाल नाही तर फक्त जामीन दिला आहे. लोकांची दिशाभूल करण्यात येत असून आमचा लढा अद्याप सुरु आहे,” असं सांगत यावेळी त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला, तसंच मुंबई पोलिसांच्या तोंडाला काळं फासलं असं म्हणणं योग्य वाटतं का? अशीदेखील विचारणा केली.

‘फडणवीसांना CDR मिळतो, मग आम्हाला का नाही’

देवेंद्र फडणवीस यांना मनसुख हिरेन प्रकरणात गुप्तचर यंत्रणांकडून CDR दिला जातो. मग आम्हाला तसा CDR का मिळाला नाही, असा सवाल अन्वय नाईक यांच्या मुलीने केला. आमच्या प्रकरणात ईमेल आणि सुसाईड नोट मिळाली होती. मग तरीही आम्हाला न्याय का मिळाला नाही, असा सवाल नाईक यांच्या मुलीने उपस्थित केला.

‘देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला बिलकूल दाद दिली नाही’

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना आमचे बिलकूल ऐकून घेतले नाही, आम्हाला दाद दिली नाही, असा थेट आरोप अन्वय नाईक यांच्या पत्नीने केला. आशियातील श्रीमंत व्यक्तीला ज्या वेगाने न्याय मिळतो तसाच न्याय आमच्यासारख्या सामान्य माणसांना मिळणार नाही का, असा सवाल अन्वय नाईक यांच्या पत्नीने उपस्थित केला.

विधानसभेतच निकाल लावायचा असेल तर न्यायव्यवस्था कशाला हवी

एखाद्या प्रकरणाचा निकाल विधानसभेतच लावायचा असेल तर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालायाची गरजच काय, असा सवाल अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीने केला. त्यांचा रोख मनसुख हिरेन प्रकरणाच्या दिशेने होता. मनसुख हिरेन प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तोंडाला काळ फासलं गेलं, असे देवेंद्र फडणवीस म्हणतात. मात्र, ते विधानसभेत खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल करत आहेत.

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या घरापासून ४०० ते ५०० मीटर अंतरावर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्यावर सर्व यंत्रणा सक्रिय होतात. पण आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या, त्यावर फडणवीस सरकारच्या काळात कोणतीही कारवाई झाली नाही. माझ्या मुलीच्या चारित्र्यावर शंका घेणाऱ्या कमेंट सोशल मीडियावर करण्यात आल्या. या प्रकरणातील आरोपी त्याच्या चॅनेलवरुन खुलेआम आम्हाला धमक्या देतो. मग महिला दिनाच्या दिवशी स्त्री स्वातंत्र्याच्या गप्पा मारण्यात काय अर्थ आहे, असा सवाल अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीने केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डोंबिवलीमध्ये द. आफ्रिकेतून आलेल्या व्यक्तीला कोरोना, नव्या व्हेरियंटची लागण झाली की नाही?

News Desk

अयोध्येस चोरांची आळंदी करणाऱ्यांना श्रीराम माफ करणार नाहीत! सामनातून टीका

Aprna

‘मला परकीयांनी पराजीत केले नाही तर स्वकीयांनीच केलं’ आशा बुचकेचं विधान!

News Desk