HW News Marathi
महाराष्ट्र

अर्णब गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

अलिबाग | रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार संपादक अर्णब गोस्वामी यांची अलिबाग न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी अलिबाग कोर्टाने सुनावली आहे. तसेच, फिरोज शेख आणि नितेश सरडा यांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात आज पोलीसांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली आहे. तसेच अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांनी त्यांना कठोर कारवाई केली जावी आणि न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.

 

 

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. अर्णब गोस्वामी यांना पोलीस कोठडी देण्याची ठाकरे सरकारची मागणी न्यायालयाने फेटाळली. अर्णब गोस्वामी यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. उद्या मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल. अर्णब गोस्वामी यांना न्याय नक्की मिळेल, असा विश्वास किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कल्याण डम्पिंग ग्राऊंडवरील कच-याच्या आगीतून संशयाचा ‘धूर’

News Desk

“गाल सर्वांनाच रंगवता येतात”, प्रवीण दरेकरांचं राष्ट्रवादीला प्रत्युत्तर

Jui Jadhav

एकनाथ खडसेंचा मुक्ताईनगरमध्ये धमाका, महाविकासआघाडी पुरस्कृत पॅनलचा विजय

News Desk