HW News Marathi
देश / विदेश

मुंबईत कोरोनाधितांच्या आकड्यात ‘कृत्रिम’ घट, फडणवीसांचा आरोप

मुंबई | संपूर्ण देशात कोरोनाची सर्वाधिक झळ ही आपल्या महाराष्टाला बसली आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा तासागणिक वाढत जाणारा आकडा आपली चिंता वाढवत आहे. त्याचप्रमाणे, राज्य सरकार समोर देखील हे मोठे आव्हान आहे.त्यातच महाराष्ट्रातही मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, आता गेल्या २ ते ३ दिवसांपासून मुंबईत नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. कमी झालाय. गेल्या 3-4 दिवसांत कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी घट झालीये. मात्र, मुंबईत कोरोनाबाधितांच्या आकड्यात ही घट झाल्यानंतर आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांची घट ही कृत्रिम असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

‪”कोविड-19 ची तपासणी आयसीएमआरच्या निकषांप्रमाणेच करावी.‬ मुंबई महापालिकेने बदललेल्या निकषांमुळे कोविड बाधित रुग्णसंख्या कृत्रिमरित्या कमी होईल. मात्र कोविड विषाणू पसरण्याचा मोठा धोका निर्माण होईल”, असे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून कळवले आहे. आयसीएमआरकडून कोरोना चाचणीसंदर्भात घालून देण्यात आलेले मूळ निकष मुंबई महानगरपालिकेकडून बदलण्यात आले असल्याने कृत्रिमरीत्या मुंबईतील कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट होते आहे. हे योग्य नसून यापुढेही कोरोनाचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो असे फडणवीसांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी ह्याची तातडीने दाखल घेण्याची विनंती देखील फडणवीसांनी केली आहे.

कोरोना तपासणीसंदर्भात ‘आयसीएमआर’चे निकष कोणते ?

आयसीएमआरच्या निर्देशांनुसार, हायरिस्कवर असणाऱ्या व्यक्तींमध्ये कोणतीही लक्षणे असो अथवा नसो त्याची कोरोना तपासणी करणे आवश्यक आहे. तो व्यक्ती त्या कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यानंतरच्या ५ व्या दिवसापासून पुढच्या १४ दिवसांपर्यंत त्याची एकदा तरी तपासणी केली जावी, असे ‘आयसीएमआर’ने सांगितले आहे. त्यामुळे या पूर्वीपर्यंत हायरिस्कवर असलेल्या सरसकट सर्वांची कोरोना चाचणी केली जात होती. मात्र, मुंबई महानगरपालिकेने २ वेळा तपासणी बाबतचे वेगवेगळे निकष जारी केल्याने संभ्रम निर्माण झाला, असे फडणवीसांनी म्हटले आहे.

मुंबई महानगरपालिकेकडून ‘आयसीएमआर’च्या कोणत्या निकषात बदल ?

मुंबई महापालिकेच्या १२ एप्रिलच्या निर्देशात म्हणण्यात आले होते कि, हायरिस्कवर असलेल्या व्यक्तीच्या चाचणीची गरजेची केवळ क्वारंटाईन करावे. तर त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने पुन्हा १५ एप्रिलला एक निर्देश जारी केला. या १५ एप्रिलच्या निर्देशानुसार, हायरिस्कवर असलेल्या पण केवळ ज्याच्यात कोरोनाची लक्षणे आढळतात अशाच व्यक्तीची निरीक्षण करून चाचणी केली जाणार आहे. याचाच दुसरा अर्थ असा कि जे हायरिस्कवर आहेत पण लक्षणे नाहीत अशांची चाचणी होणार नाही. महापालिकेच्या या निर्देशामुळे अर्थात तपासण्यांची संख्या कमी झाली आणि मुंबईतील आकडा घातला असे म्हटले जात आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाणांची भूमिका “तोंडात गोड अन् मनात खोड!

News Desk

भारताचे पायलट्स पाकिस्तानच्या ताब्यात, पाकिस्तानच्या पंतप्रधानांची कबुली

News Desk

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधानांचे देशासाठी 5 मोठे संकल्प करण्याचे केले आवाहन

Aprna