HW News Marathi
Covid-19

आषाढी वारीचे स्वरुप कसे असणार यावर आज चर्चा होणार

मुंबई | कोरोनाच्या संकटात आषाढी वारीचे स्वरूप कसे असमार असा प्रश्न वारकऱ्यांना पडला आहे. या प्रश्नावर आज (१५ मे) उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रशासन आणि पालखी सोहळ्याचे मानकरी यांची दुपारी ४ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे बैठक घेणार आहेत. कोरोनाच्या काळात या परंपरेला धक्का लागू नये यासाठी या सोहळ्याचे स्वरूप छोटे असणार असे म्हटले जात आहे. तर यावर शासनाने लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे.

दरम्यान आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या स्वरूपाबाबत काही दिवसांपूर्वी पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. या बैठकीत शासनाच्या सूचनेनुसार वारकऱ्यांची आणि समाजाची सुरक्षितता लक्षात घेऊन वारीचे स्वरूप निश्‍चित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

आषाढी वारीला राज्याच्या भावजीवनात विशेष महत्त्व आहे. आळंदी – पंढरपूर पालखी प्रस्थान स्वरूपाबाबत आळंदी आणि देहू या दोन्ही संस्थान प्रमुखांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. करोनाचा प्रादुर्भाव पाहता वारी आणि पालखी सोहळ्याच्या स्वरूपाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

श्रमिकांसाठी आत्तापर्यंत ५४२ विशेष ट्रेन सोडल्या, रेल्वेमंत्र्यांनी दिली माहिती

News Desk

विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून उद्धव ठाकरे व निलम गोऱ्हेंची नावे निश्चित

News Desk

भाजपच्या लोकांनी लवकर दौरे करून अनेक नारळाची झाडे उभी केली, मला आनंद !

News Desk