HW News Marathi
महाराष्ट्र

आषाढीची महापूजा निर्विघ्न पार पडू द्यावी । उदयनराजे भोसले 

सातारा । आषाढी एकादशी निमित वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला मराठा समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन देखील सुरु आहे. जर यावेळी लेखी उत्तर मिळाले नाही तर मुख्यमंत्र्यांना महापूजा करू देणार असा इशारा देखील आंदोलकांनी दिला होता. यावर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शांततेचं आवाहन केले आहे.

उद्या होणारी आषाढीची महापूजा निर्विघ्न पार पडावी यासाठी उदयनराजे भोसले यांनी आंदोलकांना उद्देशून पत्र लिहिले आहे. ‘वारीची परंपरा निर्धोकपणे पार पडवी त्यामुळे सकारात्मक पद्धतीने योगदान देण्याची गरज आहे’ असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. आज सलग चौथ्या दिवशीही मराठा समाजाचे आंदोलन सुरूच आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मेगा भरती करू नये अशी भूमिका आंदोलकांची आहे. त्यामुळे मागण्या मान्य केल्या नाहीत तर मुख्यमंत्र्यांना आषाढीची महापूजा करू देणार नाही, असे आंदोलकांनी म्हटले आहे. त्यामुळे उद्या महापूजा निर्धोक पार पडणार का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

महापूजा होणार ७० मिनिटांत

उद्या एकादशीच्या दिवशी पहाटे २ वाजून २० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत मुख्यमंत्री फडणवीस आणि मानाचे वारकरी दाम्पत्य यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा होणार आहे. त्यानंतर पहाटे ३ वाजल्यापासून ३.३० वाजेपर्यंत मुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी दाम्पत्य यांच्या हस्ते रुक्मिणी मातेची महापूजा होणार आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी महापूजेचे नियोजन केले आहे. तत्पूर्वी परंपरेनुसार विठ्ठल रुक्मिणीची पाद्यपूजा, नित्यपूजा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ अतुल भोसले यांच्या हस्ते होईल. पाद्यपूजा, नित्यपूजा आणि शासकीय महापूजा विधीसाठी ३ तासांचा अवधी लागणार असून या दरम्यान विठ्ठल दर्शन बंद राहणार आहे. दरम्यानच्या काळात मंदिराची सफाई करण्यात येणार आहे. रात्री ९.३० ते पहाटे १.१५ वाजेपर्यंत दर्शन मंडपातील भाविकांचे दर्शन पूर्ण करून घेतले जाणार आहे. या दरम्यान दर्शन मंडपातील सफाई केली जाणार असून, पहाटे ३ वाजून ३० मिनिटांपासून विठ्ठल दर्शन सुरू करण्यात येणार आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जर मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंना मिळाले तर आम्हाला आनंद होईल !

News Desk

सरकार सत्तास्थापन करण्यासाठी राज्यपालांकडून भाजपला निमंत्रण

News Desk

जितेंद्र आव्हाड यांनी ‘या’ कारणामुळे स्वत:ला केले क्वारंटाइन

News Desk
महाराष्ट्र

आषाढी एकादशीच्या दिवशी तीन तास विठ्ठल दर्शन रहाणार बंद

News Desk

पंढरपूर | आषाढी वारीनिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे. दोन्ही देवतांची महापूजा सुमारे ७० मिनिटे चालणार आहे. तत्पूर्वी मंदिर समिती अध्यक्ष अतुल भोसले यांच्या हस्ते विठ्ठल, रुक्मिणीची पाद्यपूजा, नित्यपूजा होणार आहे. पाद्यपूजा, नित्यपूजा आणि महापूजेसह मंदिराच्या साफ सफाईसाठी तीन तास दर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

एकादशीच्या दिवशी २३ जुलै रोजी पहाटे २ वाजून २० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत मुख्यमंत्री फडणवीस आणि मानाचे वारकरी दाम्पत्य यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा होणार आहे. त्यानंतर पहाटे तीन वाजल्यापासून ३.३० वाजेपर्यंत मुख्यमंत्री आणि मानाच्या वारकरी दाम्पत्याच्या हस्ते रुक्मिणी मातेची महापूजा होणार आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी महापूजेचे नियोजन केले आहे. तत्पूर्वी परंपरेनुसार विठ्ठल रुक्मिणीची पाद्यपूजा, नित्यपूजा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ अतुल भोसले यांच्या हस्ते होईल.

पाद्यपूजा, नित्यपूजा आणि शासकीय महापूजा विधीसाठी ३ तासांचा अवधी लागणार असून या दरम्यान विठ्ठल दर्शन बंद राहणार आहे. दरम्यानच्या काळात मंदिराची सफाई करण्यात येणार आहे. रात्री ९.३० ते पहाटे १.१५ वाजेपर्यंत दर्शन मंडपातील भाविकांचे दर्शन पूर्ण करून घेतले जाणार आहे. या दरम्यान दर्शन मंडपातील सफाई केली जाणार असून,पहाटे ३ वाजून ३० मिनिटांपासून विठ्ठल दर्शन सुरू करण्यात येणार आहे.

Related posts

निलेश राणे हे भाजपचे आऊटडेटेड नेते, शिवसेनेकडून निलेश राणेंवर प्रतिहल्ला !

News Desk

अखेर भुजबळांना जामीन मंजूर

swarit

वेळोवेळी पाठ पुरावा केल्यामुळेच ‘वैद्यनाथ’ला थकहमी मिळाली, इतरांनी श्रेय घेण्याचा प्रश्नच उदभवत नाही – पंकजा मुंडे

News Desk