HW News Marathi
महाराष्ट्र

अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत

मुंबई । राजस्थान विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या नेतृत्त्वात लढली जाईल आणि त्या पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली. राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात भाजप पुन्हा एकदा सत्तेत येईल आणि २०१९ ला नरेंद्र मोदीच पंतप्रधान होती, असा दावाही त्यांनी केला.

अमित शहा यांचा आज रविवार २२ जुलै रोजी एक दिवसीय मुंबईत दाखल झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले आहे. यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनाही भेटणार असल्याचे समजत आहे. भाजपने लोकसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान मोदी हे ऑगस्ट महिन्यात उत्तर प्रदेशात पाच जाहीर सभा घेणार आहेत. अमित शहांचाही दौरा सुरू असून शनिवारी ते निवडणूक तयारीसाठी राजस्थानमध्ये होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्य सरकारची शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना फसवी निघाली !

News Desk

राऊतांची उच्च प्रतीच्या गांजाची नशा उतरली नाही का?, चित्रा वाघ यांची टीका

News Desk

गृहविभाग हा नेहमीच चॅलेंजिंग राहिला आहे ! गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Gauri Tilekar
क्राइम

अहमदनगर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात

News Desk

अहमदनगर | अहमदनगर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात पाच वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू शिवारात रविवारी पहाटे ट्रक आणि स्कॉर्पिओमध्ये हा भीषण अपघात झाला. या अपघातात द्रोपदाबाई भाऊसाहेब कातोरे (वय ७०), रमेश भाऊसाहेब कातोरे (५१), बाळासाहेब लक्ष्मण माळवदे (वय ५०), दगडू आनंदा भांगे (वय ५०) आणि हनुमान अंबादास दुसे या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

सत्यम रमेश कातोरे (वय १६) हा जखमी झाला असून त्याच्यावर जामखेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. हे सर्वजण खरवंडी, नेवासा तालुक्यातील रहिवासी असून आषाढी वारीनिमित्ताने पंढरपुला गेले होते. पंढरपुरातील दर्शन झाल्यानंतर सर्वजण घराच्या दिशेने येत असताना अहमदनगर-सोलापूर महामार्गावर हा भीषण अपघात झाला.

Related posts

बलात्कार आरोपातून पतीची सुटका करण्यासाठी धडपडणाऱ्या विवाहितेकडे वकिलाची सेक्सची मागणी

News Desk

गणपती विसर्जन मिरवणुकीत तरूणावर चाकू हल्ला, तरूणाचा मृत्यू

News Desk

कोल्हापूरात मिरवणूक अपघातातील जखमी झालेल्या व्यक्तीचे उपचार दरम्यान मृत्यू

News Desk