HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्र्यांच्या ‘राजकारण करु नका’ या उपदेशावर आशिष शेलार काय म्हणाले?

मुंबई | राज्यात कोरोनाच्या संकटाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाला आळा कसा घालावा यासठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, दुसरीकडे राजकारण हे सुरुच आहे. काल (२६ एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांना संबोधित केले. यात त्यांनी ही राजकारणाची वेळ नाही, कोणीही घाणेरडे राजकारण करु नका. सगळ्यांनी एकत्र येऊन लढण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्यांच्या याच वक्तव्यावर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आपली भूमिका मांडली आहे.

मुख्यमंत्र्यांनी जे काल फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राजकारणाची ही वेळ नाही हा संदेश दिला त्यांचे आम्ही स्वागत करतो. ही खरंच राजकारणाची वेळ नाही. मात्र, त्यांनी हा उपदेश सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना दिला असता तर बरं झालं असतं, असा खोचक टोला लगावला आहे. तसेच, राज्यपालांवर टीका केल्यानंतर,वांद्र्यातील घटनेनंतर राज्याचे युवा मंत्री जेव्हा टीका करतात तेव्हा तुम्ही हा उपदेश करणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनाच्या या काळात विरोधी पक्ष तुमच्या सोबत आहे, तुम्ही आश्वासत राहा असे, त्यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“माझा मोबाईल माझी जबाबदारी” मनसेने महापौरांना पुन्हा डिवचले

News Desk

इंडियन मेडिकल असोसिएशनचा आज देशव्यापी बंद 

News Desk

मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो कि … ! वाझेंच्या आरोपांवर अनिल परबांचे स्पष्टीकरण

News Desk