HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अन्य पक्षात संवाद साधण्यापेक्षा स्वतःच्या पक्षात संवाद साधण्याची गरज – आशिष शेलार

मुंबई | भाजपमध्ये गेलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी राष्ट्रवादीने व्यूहरचना आखली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात काल (१२ ऑगस्ट) शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील तीनही पक्षाचं राजकारण, पक्षाची ताकद पाहून पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा प्रवेश दिला जाणार आहे.या मुद्यावर भाजपने पलटवार केला आहे.

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. ‘राष्ट्रवादीने आधी आपले घर सांभाळावे आणि नंतर भाजपवर बोलावे. शेलार म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:च्या घरातला भेद आणि विसंवाद लपवण्यासाठी भाजपचे आमदार राष्ट्रवादीत परत येणार अशा अफवा पसरवण्याचं काम राष्ट्रवादीकडून अतिशय योजनाबद्ध पद्धतीने सुरु आहे. या प्रयत्नाला कोणतंही यश मिळण्याची शक्यता दुरान्वयेही नाही”.

“स्वत:चा पक्ष वाचवण्यासाठी होणाऱ्या अडचणींना आणि त्याच्या अपयशातून मर्ग काढण्यासाठी ज्या बातम्या पसरवल्या जात आहेत, त्याचे आश्चर्य आम्हाला आहे की माध्यमं त्याला प्रसिद्धी का देत आहेत. त्यामूळे जयंत पाटील आणि अजित पवार यांनी स्वतच्या पक्षात जरी संवाद साधला तरी खूप होईल. अन्य पक्षातले आमदारांच्या बाबतीतली चिंता तुम्ही करु नका स्वःतच सरकार आणि स्वःताच पक्ष वाचवण्याची भूमिका तुम्ही घ्या”, असा सल्ला यावेळी आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिला आहे. “भाजपला ना कोणाचा परिवार फोडण्याची इच्छा नाही ना सरकार पाडापाडीत प्रयत्न नाही”, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांची भेट का घेतली? राऊतांनी दिलं उत्तर…

News Desk

गडकरींच्या गावात भाजपचा पराभव ही आगामी पराभवाची नांदी !

swarit

जालन्यात मराठा समाजाचे आमदार, खासदारांच्या घरासमोर थाळीनाद आंदोलन

News Desk