HW News Marathi
महाराष्ट्र

राजू शेट्टी यांची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झालीये, शेलारांची टिका 

सांगली | स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी जबरदस्त टीका केली आहे. राजू शेट्टी यांची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झाली असल्याची आशिष शेलार यांनी केली आहे. सांगलीमध्ये किसान आत्मनिर्भर यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

सत्तरच्या दशकात आलेल्या पिंजरा या चित्रपटातील आदर्श शिक्षकाला एका मोहापायी तमाशाच्या फडात तुणतुण घेऊन उभं रहाव लागतं. तशी अवस्था राजू शेट्टींची झाली असल्याचं शेलार यांनी म्हटलं आहे. विधान परिषदेच्या आमिषापोटी शेतकऱ्यांचा नेतृत्व करणारे राजू शेट्टी आडतदार, दलालांसाठी महाविकास आघाडीच्या बाजुने तुणतुणे घेऊन उभे राहून त्यांची वकिली ते करत असल्याचं शेलार म्हणाले. त्यामुळे शेलारांनी केलेल्या या टीकेवर राजू शेट्टी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात सुरू होणाऱ्या ‘किसान आत्मनिर्भर यात्रे’च्या पार्श्वभूमीवर ‘कोणीही आमच्या बालेकिल्ल्यात आले तरी काही फरक पडणार नाही, असा टोला शेट्टी यांनी लगावला होता. तर याच यात्रेत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवरही टीका केली होती. त्यांना जाणता राजा नाही तर विश्वासघाती राजा म्हणून बोलतील असंही त्यांनी यावेळी म्हटलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी कुणाच्या खांद्यावर बसतो याकडं लक्ष देण्यापेक्षा आपण कुठल्या कडेवर आहात,रोहित पवारांचा पडळकरांना सणसणीत टोला !

News Desk

निदान महाराष्ट्राच्या चारित्र्यावर तरी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये!, राऊतांनी ठाकरे सरकारलाच सुनावले

News Desk

आम्ही तोंड उघडलं तर अमृता फडणवीसांना तोंड लपवायला जागा राहणार नाही, शिवसेना आक्रमक 

News Desk