HW News Marathi
महाराष्ट्र

एका बबड्याच्या हट्टापायी राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिला, शेलारांचा ठाकरे सरकारला टोला

मुंबई | एका “बबड्याच्या” हट्टापायी राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला. त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला, असा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टाने अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय दिल्यानंतर शेलार यांनी ट्वीट केले आहे. आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण.. अहंकार…! ऐकतो कोण? सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला!, असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

कुलपती म्हणून राज्यपालांना, कुलगुरूंना विश्वासात घेतले नाही. शिक्षण तज्ञांची मते धुडकावली आहे. युजीसीला जुमानले नाही. मंत्री मंडळात चर्चा केली नाही. विद्यार्थ्यांना अखेर पर्यंत वेठीस धरले. अहंकारातून विद्यार्थ्यांचे एवढे महिने नुकसान केले. काय साध्य केले? असा सवाल शेलार यांनी ठाकरे सरकारला केला आहे.

 

महाराष्ट्रातील “पाडून दाखवा सरकारने” स्वतःच्या अहंकारातून स्वतःच तोंडावर पडून दाखवले! पण… विद्यार्थी मित्र, मैत्रिणींनो खचून जाऊ नका… परिस्थितीला धैर्याने समोरे जाऊ या..यश तुमच्या वाट्याला नक्की येईल…तुमचे भविष्य उज्वलच आहे, असं देखील शेलार यांनी म्हटले आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊ नये अशी राज्य सरकारची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. आणि परीक्षा घ्याव्याच लागतील असा निर्णय दिला आहे. एकवेळस तारीख पुढे ढकलता येईल, असेही म्हटले आहे. या शिवाय ३० सप्टेंबरनंतर ज्या राज्यांनी परीक्षा घ्यायच्या असतील त्यांनी युजीसीला अर्ज करावा असेही कोर्टाने म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेंकडून सीमोल्लंघनाचे संकेत, कार्यकर्ते प्रचंड उत्साहात

Gauri Tilekar

तुकाराम मुंढेंनी पीएमपीएमएलच्या १५८ बसचालकांना घरी पाठविले

swarit

‘राज्यात जे सध्या सुरु आहे ते विरोधकांच्या नैराश्याचं प्रतिक’, सरनाईकांवरील कारवाईवर पवारांची प्रतिक्रिया 

News Desk