HW News Marathi
Covid-19

हे पॅकेज ‘सिरियल’ नाही की जिचा ‘प्रोमो’ पंतप्रधानांनी दाखवावा आणि अर्थमंत्र्यांनी रोज ‘एपिसोड’ सादर करावा

मुंबई | पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटीच्या पॅकेजची माहिती गेले तीन दिवस केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देत आहेत. त्यावर आता सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चोला लगावला आहे. जर कोरोना पॅकेज एकाचवेळी जाहीर करणे शक्य असताना रोज पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणे मेङमजे आश्चर्यकारक आहे. हे कोरोनाचे पॅकेज म्हणजे टीव्हीवरील सिरियल नाही की जिचा प्रोमो पंतप्रधानांनी दाखवावा आणि ऱप्थमंत्र्यांनी रोज एक एपिसोड सादर करावा, अशा आशयाचे ट्विट करत अशोक चव्हाणांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे.

तसेच, शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी केंद्राने राज्य सरकारांकडे सहकार्याचा हात पुढे करण्याची आवश्यकता आहे. खते, बी-बियाणे, किटकनाशके, कृषी उपकरणांवरील जीएसटी कमी करण्याची गरज आहे. मात्र, त्याऐवजी काही पायाभूत सुविधा व नवीन नियम घोषित करणे ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

कोरोनासारख्या जागतिक आपत्तीच्या काळातील मदत पॅकेज कसे असते ते केंद्र सरकारने समजून घेतले पाहिजे. अशा पॅकेजमध्ये तातडीची व भरीव मदत तसेच तत्कालीन उपाययोजनांवर भर असला पाहिजे. अर्थसंकल्पात जाहीर करावयाचे दीर्घकालीन उपाय म्हणजे पॅकेज असू शकत नाही, असा आक्षेपही त्यांनी घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींच्या पश्चिम बंगालमध्ये उद्या आयोजित सर्व सभा रद्द

News Desk

जीवनावश्यक वस्तूंवरील सरकारी नियंत्रण हटवण्यात येणार

News Desk

#Coronavirus : जितेंद्र आव्हाडांची कोरोनावर यशस्वी मात

News Desk