HW News Marathi
Covid-19

कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही – मुख्यमंत्री

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील राज्यांमध्ये सध्या कोरोनाची स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी १० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांनी हा संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनावर मात करण्यासाठी काही मार्गदर्शनही केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील पंतप्रधानांशी संवाद साधला. “कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही यासाठी प्रयत्नशील आहे”,असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

राज्यातील मृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून मुंबईतील धारावी, वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल सर्वंत्र कौतुक होत आहे. मात्र अजुनही लढाई संपली नाही. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही यासाठी प्रयत्नशील असल्याचे उद्धव ठाकरे यांनी या संवादात सांगितले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या या विश्वासाने लवकरच महाराष्ट्र देखील कोरोनामुक्त होईल असा विश्वास निर्माण झाला आहे.

“कोरोनावर अद्याप औषध नाही आणि लस अजून उपलब्ध झालेली नाही. जनजागृती करतांना आज घडीला तरी मास्क, सोशल डिस्टंसिंग हेच औषध आणि लस आहे असे नागरिकांना समजून सांगितले. अशा पद्धतीने कोरोनासोबत आपण जगायला शिकलो तर लॉकडाउन नाही तर अनलॉकिंगची प्रक्रिया आणखी सोपी व जलद होईल,” असे मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी मांडले. राज्यात कोरोना उपचारासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि इतर सुविधांसह सज्ज अशा साडेतीन लाख बेड्स उपलब्ध असल्याचे सांगतानाच यासुविधांसाठी डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी यांची गरज असल्याचंही पंतप्रधानांना सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चिंताजनक ! देशातील कोरोना बळींचा आकडा १ लाखाच्या पार 

News Desk

मजूरांच्या खर्चाबद्दल केंद्र खोटं बोलतयं – अनिल देशमुख

News Desk

आम्हाला पाकिस्तान किंवा चीनची जमीन देखील नको !

News Desk