HW News Marathi
महाराष्ट्र

अशोक चव्हाणांनी विलासराव देशमुखांचा ‘तो’ व्हिडिओ केला ट्विट!

मुंबई। स्व. विलासराव देशमुख यांचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारं भाषण आता अचानक सोशल मीडियात व्हायरल होऊ लागलं आहे. मागील काही दिवसांपासून काँग्रेसच्या नेतृत्वावरून टीका जात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही बुधवारी युपीए वगैरे काही नाही, असं म्हणत काँग्रेसला वगळून आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत. म्हणूनच आता विलासराव देशमुख यांचं हे भाषण महाविकास आघाडीतील मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विट केल आहे.

काँग्रेसमुक्त विरोधी पक्ष देण्याचा प्रयत्न

आता देशात काँग्रेसमुक्त विरोधी पक्ष देण्याचा प्रयत्न करणाऱ्या ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाही दृष्टिकोन बदलताना दिसत आहे. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जींनी देशात यूपीए नाही असे राष्ट्रवादीचे नेत्यांनी म्हटल्याचे बरोबर आहे असे म्हटले. या सगळ्या घडामोडी बॅनर्जी यांच्या दौऱ्यानंतर घडलेल्या पहायला मिळाल्या.

काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यांवरुन गंभीर टीका

मात्र आता ममता यांच्या याच वक्तव्यांनंतर आणि मुंबई दौऱ्यानंतर काँग्रेसकडूनही या संदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे. भारतीय राजकारणातील वास्तव सर्वांनाच माहीत आहे. काँग्रेसशिवाय भाजपला कोणीही पराभूत करू शकत नाही, असा विचार करणे हे केवळ स्वप्न आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिली आहे. तर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यांवरुन आता गंभीर टीका केलेली पहायला मिळाली.

स्व. विलासराव देशमुख यांच्या या विधानाची सहज आठवण

बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विलासराव देशमुखांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. “काँग्रेसची चाल बुद्धिबळातील हत्तीसारखी सरळ आणि थेट धडक देणारी आहे. काँग्रेस उंटासारखी तिरकी चालत नाही अन् घोड्यासारखी अडीच घरंही जात नाही.” अलीकडे काँग्रेसबाबत काही मंडळींना झालेल्या गैरसमजाच्या पार्श्वभूमीवर स्व. विलासराव देशमुख यांच्या या विधानाची सहज आठवण झाली,” असं कॅप्शन देत काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडीतील मंत्री अशोक चव्हाण यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे.

जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी भाजपच्या विरोधात ही लढाई

ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यात त्यांनी म्हटलंय की, देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढण्याची आवश्यकता आहे पण कोणी लढण्यास तयार नसल्यास किंवा सारखे परदेशात जात असल्यास आम्ही तरी काय करणार, असा सवाल करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केलेली पहायला मिळाली. चव्हाण यांनी पोस्ट केलेल्या या भाषणावरून आता राजकीय चर्चांना ऊत आला आहे. ममता बॅनर्जी यांना बुधवारी पत्रकार परिषदेत आपण कॉंग्रेसला वगळून आघाडी तयार करणार का असे विचारले असता त्या म्हणाल्या होत्या की, देशाच्या जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी भाजपच्या विरोधात ही लढाई सुरु केली जाणार आहे. आता युपीए वैगेरे काही नाही, जे सोबत येतील त्या सर्वांना आम्ही सोबत घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

किरीट सोमय्या मुंबईत स्थानबद्ध, कोल्हापुरात नो एन्ट्री!

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक संपन्न

Aprna

जलयुक्त शिवार योजनेत सहभागी असलेल्या त्यांची पण चौकशी होणार का?

News Desk