HW News Marathi
महाराष्ट्र

“शरद पवारांना घरातलेही गांभीर्याने घेत नसावेत,” अतुल भातखळकरांचा खोचक टोला

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल(२७ जुलै) पत्रकार परिषद घेतली होती. परिषदेत त्यांनी कोणत्याही मंत्र्यांनी दौरे करू नये असं आवाहन केलं होतं. मात्र आज(२८ जुलै) राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी कोकणात पोलादपूरला जाऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली आहे. या वागणुकीमुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत

रोहित पवार यांनी शरद पवारांचा शब्द डावलत दौरा केल्याने आता त्याचे पडसाद दिसू लागेल आहेत. आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट केलं आहे. एका बातमीमध्ये पूरग्रस्त भागातील दौरे नेत्यांनी टाळा, असे आवाहन शरद पवारांनी केले आहे. तर दुसरी बातमी आमदार रोहित पवार पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज कऱ्हाडमध्ये जाणार असल्याची आहे. या दोन बातम्यांचा संदर्भ घेत अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. “जाणते पवार आज बोलतात, उद्या कोलांटी मारतात. त्यामुळे बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत” असे भातखळकर म्हणाले आहेत.

रोहित पवारांचा दौरा सुरु

रोहित पवारांनी काल (२७ जुलै) त्यांनी कोकणातील खेडचा दौरा केला. तिथे झालेल्या नुकसानीही पाहणी केली. तर, आज (२८ जुलै) त्यांनी पोलादपूरचा दौरा केला. तसेच, नागरिकांना मदतीचे आश्वासन दिले आहे. एकीकडे शरद पवारांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी सोडून दौरे टाळावेत. याचं कारण असं की तेथील प्रशासकीय यंत्रणा तुमच्यामागे लागते आणि तेथील मदतीची कामं खोळंबतात. पण, त्यांच्या नातवानेच म्हणजे रोहित पवारांनीच त्यांच्या आदेशाचे आणि सल्ल्याचे पालन न केल्याचं दिसून येत आहे.

काय म्हणाले पवार?

माझा पूर्वीचा अनुभव, विशेषत: लातूरच्या भूकंपा वेळचा अनुभव आहे. अशा घटनानंतर अनेक लोक गाड्या घेऊन त्या ठिकाणी जातात. माझं आवाहन आहे, आता शासकीय यंत्रणा पुनर्वसनाच्या कामात व्यस्त आहेत. त्यांचे लक्ष विचलित होईल, त्यामुळे अनावश्यक दौरे टाळावे. मी लातूरला असताना, आम्ही सगळे जण कामात होतो, पंतप्रधान येत होते. त्यावेळी मी पंतप्रधानांना सांगितलं दहा दिवस येऊ नका. तुम्ही आला तर यंत्रणा तिकडे लावावी लागेल, मला आनंद आहे, माझी विनंती मान्य केली ते दहा दिवसानंतर आले. कोणत्याही नेत्यांनी प्रसंगावधान राखावं. मी सुद्धा आता दौऱ्यावर जात नाही. त्याचं कारण बाकीची यंत्रणा फिरवावी लागते. आपल्या भोवती यंत्रणा ठेवणं योग्य नाही. दौरे होत आहेत त्याने धीर मिळतो . पण दौऱ्यामुळं शासकीय यंत्रणेचं काम वाढतं. त्यामुळं दौरे होऊ नये असं मला वाटतं. दौऱ्याला गेल्यामुळं यंत्रणेला त्रास होतो, असं शरद पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बेळगाव सीमाप्रश्नावर कर्नाटक-महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी !

News Desk

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना राष्ट्रवादीकडून आदरांजली…

News Desk

सांगलीत १४ वर्षीय मुलाला मगरीने पाण्यात ओढले

News Desk