HW News Marathi
महाराष्ट्र

देशमुखांना हटवण्याचे बळ मुख्यमंत्र्यांमध्ये नाही!, भाजपची बोचरी टीका

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी होणार असून सीबीआयला १५ दिवसांत प्राथमिक चौकशीचा तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्यासहित दाखल इतर दोन जनहित याचिका फेटाळून लावत वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर हे आदेश दिले आहेत. यावेळी न्यायालयाने १५ दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचा आदेश सीबीआयला दिला आहे. न्यायालयाने परमबीर यांची याचिका निकाली काढताना त्यांनी आपल्या तक्रारी संबंधित यंत्रणेसमोर मांडाव्यात असं स्पष्ट केलं आहे.

आता यावरून भाजप आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. ‘गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घ्या’ अशी मागणी भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटीच्या वसुलीच्या आरोपांची गंभीर दखल घेत याप्रकरणी CBI चौकशीचा आदेश हायकोर्टाने दिला आहे. देशमुखांना हटवण्याचे बळ मुख्यमंत्र्यांमध्ये नाही,थोडी तरी लाज शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी बोचरी टीका केली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“उच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. सीबीआयने पंधरा दिवसांत प्राथमिक चौकशी करावी”, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यावरुन एकप्रकारे सीबीआय चौकशी न्यायालयाने मान्य केली असल्याचे फडण‍वीस यांनी म्हटले आहे. हप्तेवसुलीचे काम सरकारच्या आणि मंत्र्यांच्या आशीर्वादाने होत होतं. या प्रकरणात उच्च न्यायालयाने कडक पाऊल उचलले आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. कशाप्रकारे हप्तावसुली चालली होती. हे सत्य बाहेर येईल. काही लोकांनी सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. हे भासवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला उच्च न्यायालयाने उत्तर दिले, असाही टोला फडणवीसांनी लगावला आहे.

गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी तो घेतला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी फडणवीसांनी सचिन वाझे प्रकरणी भाष्य केले. मुख्यमंत्र्यांनी सचिन वाझेंची पाठराखण केली. राज्यात गंभीर प्रकार घडल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगले. त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. हे आश्चर्यकारक आहे. त्यांना आपल्या पदाचा मान राखावा. अन्यथा लोक तुमच्याकडे संशयाने बघतील, असा सूचक इशारा फडणवीसांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांगलीत शिक्षक बँकेच्या सभेत मारहाण

swarit

“आता त्यांना ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’च म्हणत बसावे लागेल”, खडसेंचा टोला

News Desk

बारामतीत कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी युद्धपातळीवर करा…

News Desk