HW News Marathi
Covid-19

“हे सरकार आहे की सर्कस?”, लॉक-अनलॉकच्या गोंधळावरून अतुल भातखळकरांचा सरकारवर निशाणा!

मुंबई | राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती राज्याच्या मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत दिली. त्याच्या काही वेळातच जनसंपर्क विभागाकडून निर्बंध शिथिल केल्याचं विचार सुरू आहे असं सांगण्यात आलं आहे. शासनाच्या याच गोंधळावरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर चांगलीच टीका केली आहे. त्याचबरोबर हे सरकार आहे की सर्कस असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, मंत्री घोषणा करतात निर्बंध हटवणार, एका तासाने शासन निर्णय जाहीर होतो, तसं काही नाही हो….हे सरकार आहे की सर्कस?

 

काही वेळापूर्वीच राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घोषणा केली की, राज्यातला लॉकडाऊन पाच टप्प्यांमध्ये हटवण्यात येणार आहेत. वडेट्टीवार यांनी यासंदर्भातली संपूर्ण माहिती पत्रकार परिषदेत सादर केली. मात्र, त्यानंतर काही वेळातच सरकारच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आलं की, राज्यातले कोणतेही निर्बंध शिथिल झालेले नाहीत. नव्या नियमांचा प्रस्ताव अद्याप विचाराधीन आहे. त्यामुळे आता लॉकडाउन की अनलॉक असा संभ्रम निर्माण झाला आहे. यावरुनच आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.

भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनीही सरकारवर सडकून टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, अंधेर नगरी, चौपट राजा अशी राज्याची अवस्था महाविकास आघाडी सरकार करत आहे. कुणाचा कुणाशी ताळमेळ नाही. विजय वडेट्टीवार पत्रकार परिषद घेऊन लॉकडाउन केल्याची घोषणा करतात, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीत निर्णय झाल्याचे सांगतात. काही वेळानंतर सरकारी प्रेसनोट येते की अनलॉकचा प्रस्ताव आहे, निर्णय नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हाफकिन संस्थेने लस विकसित करण्यावर जास्त भर द्यावा – अमित देशमुख

News Desk

देशातील रुग्ण संख्या ६१ लाखांच्या पुढे !

News Desk

एसटीची मोफत बस प्रवास सुविधा फक्त ‘या’ दोन परिस्थितीच लागू राहणार !

News Desk