HW News Marathi
देश / विदेश

लेखकाने क्षमा मागितली असून पुस्तकही मागे – प्रकाश जावडेकर

‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन सुरू झालेल्या वादावर भाजपने अखेर पडदा टाकला आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकाचा भाजपशी काहीही संबंध नाही. भाजपच्या कार्यक्रमाचाही तो भाग नव्हता. लेखकाने क्षमा मागितली असून पुस्तकही मागे घेण्यात आले असून हा वाद आता संपला आहे, असं ट्विट करुन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना होऊ शकत नाही. शिवाजी महाराज जगाचे राजे होते, कल्याणकारी राज्य त्यांनी चालवलं त्यामुळेच इतक्या वर्षांनंतर त्यांचे स्मरण आजही लोकं करतात. अतुलनीय व्यक्तिमत्वाची तुलना केली जाऊ शकत नाही. या पुस्तकामुळे अनेक ठिकाणी आंदोलन झालं. हे पुस्तक ज्यांनी लिहिलं आहे ते लेखक जयभगवान गोयल यांनी माफी मागितली आहे. हे पुस्तक मागे घेण्यात आलं आहे. हा मुद्दा इथे संपवावा अशी विनंती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.

भाजपच्या दिल्ली येथील कार्यालयात भाजप नेते जय भगवान गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणारे पुस्तक प्रकाशित केले. त्यांनी ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ असे पुस्तक लिहून त्याचे प्रकाशनही केले.या पुस्तकाच्या प्रकाशानंतर भाजपवर संपुर्ण महाराष्ट्रातून टिकेची झोड उठली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकारला मोठा धक्का! OBC आरक्षणासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

News Desk

बिहार विधानसभा निवडणूकीत शिवसेना ४०-५० जागा लढवणार –  संजय राऊत

News Desk

#PulwamaAttack : गृहमंत्री राजनाथ सिंह श्रीनगरकडे रवाना

News Desk