HW News Marathi
महाराष्ट्र

हलगर्जीपणामुळे अवनीची शिकार, एनटीसीचा ठपका

नागपूर | अवनी वाघीणची हिची शिकार करण्यात आल्यानंतर वादाला तोंड फुटले होते. यानंतर अवनीच्या शिकारीच्या वेळी हलगर्जीपणा झाला असल्याचा ठपका एनटीसीच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. ढिसाळ नियोजन आणि हलगर्जीपणा यामुळे अखेरीस अवनीला ठार मारावे लागले असे या अहवालात म्हटले होते.

१३ जणांचा बळी घेतल्याचा संशय असलेल्या अवनी वाघिणीला अनेक दिवसांच्या शोधमोहिमेनंतर ठार मारण्यात आले होते. अवनीला ठार केल्यानंतर स्थानिक लोकांनी समाधान व्यक्त केले असले तरी प्राणीप्रेमी, विविध सामाजिक संघटना आणि विरोध पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. परंतु नॅशनल टायगर कन्झर्वेशन अॅथॉरिटीच्या अहवालामध्येही अवनीच्या मृत्यूला नियोजनातील ढिसाळपणा कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अवनीला पकडण्यासाठी डॉ. कडू. यांनी दिलेला डार्ट २४ तासांत वापरणे आवश्यक होते. मात्र ते ५६ तासांनंतर वापरण्यात आले. त्यामुळे अवनी बेशुद्ध झाली नाही. अखेरीस तिला गोळ्या घातून ठार करावे लागले असे या अहवालात म्हटले आहे.

अवनीला ठार मारल्याप्रकरणी शार्प शूटर नवाब शहाफत अली खान यांच्यावरही आरोप झाले होते. परंतु आम्ही शिकारी असलो तरी आम्हालाही वन्यजीवांचे प्रेम आहे. १३ शेतकरी, शेतमजुरांचा बळी घेणा-या नरभक्षक वाघीण अवनीलाही जीवाने मारायचे नव्हतेच. तिला बेशुद्ध करण्यासाठी अनेक महिने वाट पाहिली, संधी शोधली. त्या रात्रीही बेशुद्धीचा प्रयत्न झाला. मात्र तिने थेट झडप घातल्याने आमच्या सोबतच्या इतरांचे संरक्षण करण्यासाठी नाईलाजाने तिच्यावर गोळी झाडावी लागली, अशी स्पष्टोक्ती हैदराबाद येथील शार्प शूटर नवाब शहाफत अली खान यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राणा दाम्पत्याना आज जामीन मिळणार की तुरुंगात मुक्काम वाढणार?

Aprna

अशोक चव्हाणांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे महाविकासआघाडीत नाराजी नाट्य ?

swarit

करी कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याची अट रद्द करा!

News Desk
व्हिडीओ

६८ वर्षीय वृद्धाची बाबासाहेबांना अनोखी श्रद्धांजली

News Desk

घायाळ पाखरांना पंख दिले तू, मुक्या वेदनांना शब्द दिले तू असे महामानवाला वंदन करत आपल्या कलेच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्याची अनोखी प्रथा गुरुवारीही धम्मभक्तांना पाहायला मिळाली. बाबासाहेबांच्या प्रतिमेची सुंदर रांगोळी नाशिक येथील ज्येष्ठ रांगोळीकार नारायण चुंबळ यांनी रेखाटली होती.

गुरुवारी 6 डिसेंबरला दादर येथील चैत्यभूमीवर लाखो बुद्ध अनुयायांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.या प्रचंड जनसमुदायात लहान थोरांपासून सर्वच अनुयायांचा समावेश होता. परंतु गेल्या 10 वर्षांपासून आपल्या कलेमार्फत रांगोळी साकारत अनोखा आदर्श , प्रेरणा अनुयायांपुढे ठेवली आहे. ही रांगोळी बाबासाहेबांची फक्त प्रतिमा नसून आमची प्रेरणा आहे. त्यांनी संविधानातून दिलेला समतेचा संदेश आज मी माझ्या कलेतून पुढे लोकांपर्यंत नेत आहे, असे ६८ वर्षीय नारायण चुंबळ यांनी सांगितले.

या रांगोळीसाठी त्यांनी सकाळी 6 वाजता सुरुवात केली. ३ तासांचा कालावधी या रांगोळीसाठी त्यांना लागला यामध्ये एकूण 15 किलो रांगोळी आणि आदी साहित्याचा वापर करण्यात आला आहे.

Related posts

Raj Thackeray यांनी MNS च्या प्रवक्त्यांना ‘हर हर महादेव’ चित्रपटाबाबत न बोलण्याचे दिले आदेश

Seema Adhe

Prakash Aambedkar | प्रकाश आंबेडकर कॉंग्रेसच्या संपर्कात !

Arati More

मुख्यमंत्र्यांनी टाळली Chhatrapati Sambhajiraje यांची भेट

Seema Adhe