HW News Marathi
राजकारण

अवनीच्या हत्येची निष्पक्ष चौकशी व्हावी !

मुंबई | अवनी वाघिणीच्या हत्येची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. अवनी वाघिणीच्या हत्येवरून भाजप सरकारवर सर्व स्तरातून टीका होता आहे. याआधी वाघिणीच्या हत्येनंतर शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील ‘वन खात्याचे नाव बदलून शिकारी खाते असे करायला हवे’ असे ट्विट करून भाजप सरकार आणि वनखात्यावर हल्लाबोल केला आहे.

अवनी (टी-१) वाघिणीला पकडण्यासाठी वनविभाग गेल्या ४७दिवसांपासून सुरू करत होते. शेवटी वनविभागाच्या रेस्क्यू टीमने (२ नोव्हेंबर)ला ठार केले होते. अवनी वाघिणीने १३ जणांचा जीव घेतला होता. अवनीच्या हत्येवरून फडणवीस सरकारवर निशाणा साधून वनमंत्री सुधीर मुनंगटीवार यांचा राजीनाम्याची मागणी केली आहे. “अवनीच्या अतिशय क्रूरपणे करण्यात आलेल्या हत्येमुळे मला दुःख झालं आहे, असे ट्विट केंद्रीय मंत्री मनेका गांधी केले होते.

“देशात प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीवरुन देशाची महानता ठरते,असं महात्मा गांधी यांनी म्हटले होते”, असे ट्विट करत राहुल गांधी यांनी अवनीच्या हत्येचा निषेध व्यक्त केला होता.

अवनीला मारण्यासाठी शार्प शूटर अजगर अलीने गोळी झाडून तिची हत्या यात तिचा मृत्यू झाला. यानंतर वाघिणीचा मृतनंतर तिचे दोन बछडे बेपत्ता झाले असून त्यांचा शोध राज्य सरकार घेत आहे. या अवनीचे बछडे नरभक्षक होण्याची भिती लोकांनी व्यक्त केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अवनीमुळे गावांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र अवणी ( टी-१) वाघिणीच्या मृत्यूनंतर वन्यजीव प्रेमींनी वनविभागावर टीका केली आहे. अवनीच्या हत्येनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आदी राजकीय नेत्यांनी भाजप सरकारची कोंडी केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रामदास आठवले आज घेणार केंद्रीय मंत्रिपदाची शपथ

News Desk

दीड महिन्यापूर्वी आम्ही सुद्धा सर्वात मोठी हंडी फोडली! – मुख्यमंत्री

Aprna

चेंबूर सामुहिक बलात्काराची एसआयटी चौकशी करण्याची राष्ट्रवादींची मागणी

News Desk