HW News Marathi
महाराष्ट्र

बच्चू कडूंनी पुण्यातील घरमालकांना पत्राद्वारे कोणती विनंती केली ?

मुंबई | कोरोनाचा राज्यात धुमाकुळ सुरु आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाईन पंतप्रधानांनी जाहीर केला आहे. त्यामूळे शाळा तर बंद आहेच परंतू अनेक परीक्षा या रद्द करण्यात आल्या तर काही पुढे ढकलण्यात आल्या. दरम्यान, पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाठीआलेल्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. त्यामूळे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पुण्यातील घरमालकांना विनंती करत पत्र लिहीले आहे.

पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आलेले सर्व विद्यार्थी हे जवळपास शेतकरी कुटुंबातील आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेती व्यवसाय धोक्यात आहे. यात अन्नदात्यांच्या मुलांना आपल्या मुलांप्रमाणे समजून त्यांच्याकडून रूम भाडे घेऊ नये, अशी विनंती बच्चू कडू यांनी पुण्यातील घरमालकांना पत्रातून केली आहे.

https://twitter.com/bachhukadu0796/status/1248613684596752384?s=20

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पुण्यातील आंबिल ओढ्याचा वाद पेटला, नागरिकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न

News Desk

दानवेंचा पराभव करत नाही तोवर …शिवसेनेच्या मंत्र्यांने उचलला विडा!

News Desk

ठाकरे सरकारने कोरोनाच्या काळात काय काय केले? मुख्यमंत्र्यानी वाचली अख्खी लिस्ट!

News Desk