HW News Marathi
महाराष्ट्र

विश्वास पाटील यांची सीआयडी चौकशी करणार

मुंबई | मुंबईतील एसआरए( झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरण ) चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी केलेल्या गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी करण्यात येईल अशी माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विधानसभेत दिली.

मुंबईतील झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांनी मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केल्याचा तारांकित प्रश्न विचारण्यात आला होता. आमदार संतोष दानवे, सुनिल शिंदे, सुनिल प्रभू, यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. विश्वास पाटील यांनी निवृत्तीच्या काही दिवस आगोदर १३७ फाईलींना तात्काळ मंजूरी दिली होती. अतिजलद मंजूरी दिलेल्या १३७ फाईली पैकी ३३ प्रकरणात गैरव्यवहार व अनियमितता असल्याचे सिद्ध झाले आहे.

या प्रकरणात कोकण विभागीय आयूक्तांकडून चौकशी करण्यात येत अशी माहिती राज्यमंत्र्यांनी उत्तरात दिली.

यावेळी विश्वास पाटील यांनी अप्पर जिल्हाधिकारी असतांना काही गैरव्यवहार केला असल्याचे प्रकरण आहे. त्याची चौकशी देखील काय झाली आहे हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. तसेच विश्वास पाटील यांनी निवृत्तीच्या आगोदर ज्या फाईली मंजूर केल्या आहेत त्यामध्ये विश्वास पाटील यांच्या पत्नी या सहभागी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची उत्तस्तरीय चौकशी करण्याची मागणी आमदारांनी केली.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याच विषयावर बोलतांना सांगितले की, विश्वास पाटील यांनी नेमक्या कोणत्या ३३ फाईलींना मंजूरी दिलेली आहे त्यांची यादी सभागृहासमोर सादर करा. एसआरए चा घोटाळा हा खूप मोठा घोटाळा आहे त्यामुळे या सर्व प्रकरणाची सीबीआय किंवा सीआयडी मार्फत चौकशी करण्याची गरज असल्याची मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची घोषणा केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पालघरमध्ये मॉब लिंचिंगची घटनेप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा !

News Desk

‘मराठा, ओबीसी, धनगर समाजाप्रति भाजपचे प्रेम पुतणा मावशीचं’, विनायक राऊतांचा भाजपला खोचक टोला!

News Desk

“सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करत आहे”

News Desk
मुंबई

भीमा कोरेगाव प्रकरण गुन्हे घेणार मागे, ९ कोटी ४५ लाखांची करणार भरपाई

News Desk

मुंबई | ३० डिसेंबर रोजी भीमा कोरेगाव येथे झलेली जातीय दंगल हे मा.मुख्यमंत्री फडणवीसांचं अपयश असण्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. त्यावर प्रतिक्रिया देत गुन्हे मागे घेऊन तब्बल ९ कोटी ४५ लाखांची भरपाई करण्याचा दावा करत सडेतोड उत्तर मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

भीमा कोरेगाव ला झालेल्या जातीय दंगलीत मोठ्या प्रमाणात मानवी आणि आर्थिक हानी महाराष्ट्राला झाली असता. या हानीत सर्वसामान्यांसहित पोलीस अधिकारी तसेच पोलिसांचाही समावेश आहे.तसेच त्यानंतर झालेल्या महाराष्ट्र बंदीचे पडसाद म्हणून ३ कोटींचे नुकसानाला महाराष्ट्राला सामोरे जावे लागले.

त्या प्रसंगाच्या संदर्भात ५८ गुन्ह्यात १६५ अटकेत, तसेच अट्रोसिटी कलमानुसार तब्बल ११९९ आरोपीना अटक करण्यात आले. ह्या आकड्यानुसार सध्या फक्त २२ आरोपी अटकेत आहेत. ह्याची भरपाई म्हणून ९ कोटी ४५ लाखांची भरपाई करून गुन्हे मागे घेण्याचा निःपक्षपाती निर्णय मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी केला

Related posts

२०० विद्यार्थ्यांना ठाण्यातील फेक युनिव्हर्सिटीचा फटका, उकळले कोट्यावधी रुपये

News Desk

आरपीआय नगराध्यक्षाने केली पोलीस कर्मचा-याला मारहाण

News Desk

कफ परेड येथे खारफुटीच्या झाडाला गळफास लावून तरुणाची आत्महत्या

News Desk