HW News Marathi
Covid-19

खतांच्या वाढत्या किमती विरोधात बच्चू कडू करणार टाळी आणि थाली बजाओ आंदोलन !

मुंबई | एकीकडे आधीच शेतकरी संकटात आहे. त्यात लॉकडाऊनमुळे शेतकरी डबघाईला आलेला असतानाच आता रासायनिक खतांच्या किंमती प्रचंड वाढल्याने शेतकऱ्यांसमोर नवीन संकट आल आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या खत भाववाढीच्या निषेधार्थ राज्यमंत्री बच्चू कडू आता आक्रमक झाले असून येत्या 20 तारखेला राज्यमंत्री बच्चू कडू हे ताली बजाओ,थाळी बजाओ आंदोलन करणार आहे. रासायनिक खतांचे वाढलेले भाव तातडीने कमी करण्याची मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.

२० तारखेला सायंकाळी सहा वाजता आपल्या घरीच प्रत्येक शेतकऱ्याने हे आंदोलन करण्याचे आवाहनही राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केले आहे. तसेच तूर, मूग, उडीद या कडधान्याची आयात थांबवण्याची मागणी बच्चू कडू यांनी सरकारकडे केलेली आहे. खतांच्या किमती कमी करण्यासाठी शेतकरी नेते सध्या मागणी करत आहे आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून रासायनिक खतांचे वाढलेले भाव तातडीने कमी करण्याची मागणी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू आता हे आंदोलन करणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनच्या काळातही ‘या’ विद्यापीठात सुरु आहेत वर्ग

News Desk

“मागेल त्याला ‘वॅक्सिन’ द्या!”, अशोक चव्हाणांची मागणी

News Desk

देशात कोरोनाचं थैमान! २४ तासांत ४ हजारांपेक्षा अधिक बळी

News Desk