HW News Marathi
महाराष्ट्र

बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मुंबईतील रिलायन्सच्या कार्यालयावर निघणार मोर्चा

नागपूर | दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनाचा आजचा (२२ डिसेंबर) २७ वा दिवस आहे. या शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आज राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मुंबईतील रिलायन्सच्या कार्यालयावर काढण्यात येणार आहे. या मोर्चात १५ ते २० हजार लोकं सहभागी होतील अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. यावेळी रिलायन्स कार्यालयाबाहेर सभाही घेतली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे अंबानींचं ऐकतात म्हणून रिलायन्स कार्यालयावर मोर्चा काढला जाणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. रिलायन्स कार्यालयात अंबानींना भेटण्यासाठी जात आहे. रिलायन्स कार्यालहाबाहेरील हे आंदोलन आज संपेल की जास्त चालेल हे सांगता येत नसल्याचंही बच्चू कडू म्हणाले. या आंदोलनात स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढावही सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी आनंदी झाला म्हणून भाजपास एरंडेल घेऊन कळवळण्याचा अधिकार नाही !

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांची घेणार भेट!

News Desk

बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सामाजिक न्याय विभाग अभिनव पद्धतीने साजरी करणार! – धनंजय मुंडे

News Desk