HW News Marathi
महाराष्ट्र

बाळासाहेबांनी मला पद दिलं बेडूक म्हणून नाही तर वाघ म्हणून! – नारायण राणे

मुंबई | काल (२५ ऑक्टोबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने नारायण राणे त्यांचे दोन सुपुत्र निलेश आणि नितेश राणे यांना टार्गेट करत बेडूक आणि त्यांची २ पिल्लू असे संबोधले होते. त्यावरुन निलेश आणि नितेश राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांना सुनावले होतेच. मात्र आज नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत या टीकेचे उत्तर दिले आहे. “मला आणि माझ्या मुलांना बेडुक म्हणतो हा माणूस? हा माणूस पुळचट आहे अशीही टीका नारायण राणे यांनी केली आहे. बेडूक एकाच दिशेने जातो मात्र यांची अवस्थेतूनच गांडूळासारखी झाली आहे, अशा शब्दांत प्रहार केला आहे.

इतकेच नाही, तर २५ वर्षांत शिवसेना संपेल असेही राणे म्हणाले आहेत. आणि संजय राऊत हे विदुषकासारखे आहेत असे म्हणत त्यांची खिल्लीही उडवली. तर, अभिनेता सुशांसिंग राजपूतच्या आत्महत्येबद्दल बोलताना ते म्हणाले की, सुशांतची आत्महत्या नाही, खून आहे, किती लपाल, किती वाचायचा प्रयत्न कराल, पोलिसांचा वापर करुन मुलाला वाचवलं, सत्तेचा दुरुपयोग केला, दिशाचे हत्या प्रकरणही बाहेर येईल, बलात्कार कोणी केला ते समजेल”, असा घणाघातही त्यांनी केला आहे.

कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरे पिंजऱ्यात बसून कारभार करत होते. मग तुम्हा वाघ आहात ते पिंजऱ्यातील आहात की पिंजऱ्याबाहेरचे? असा टोला लगावत राणे यांनी मी शिवसेनेत ३९ वर्ष होतो, बाळासाहेबांनी मला पदं दिली, बेडूक म्हणून नाही, तर वाघ म्हणून मी काम केलं, असं राणे यांनी सांगितलं.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील भाषण हे शिवराळ होतं. अत्यंत निर्बुद्ध बरळणं सुरू होतं, असा गंभीर आरोप भाजपचे राज्यसभेतील खासदार नारायण राणे यांनी केला आहे.

राणेंच्या पत्रकार परिषदेतले महत्त्वाचे मुद्दे

– कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले

– कोरोनाच्या काळात पिंजऱ्यात बसून, मुख्यमंत्री घरात बसून?

– शेण खातो आणि गोमूत्र पितो अशी भाषा? ही कसली भाषा? निषेध करतो, ही भाषा बदलली नाही तर आमचाही तोल जाईल, मातोश्रीच्या आतल्या गोष्टी बाहेर काढेन

– सुशांतची आत्महत्या नाही, खून आहे, किती लपाल, किती वाचायचा प्रयत्न कराल, पोलिसांचा वापर करुन मुलाला वाचवलं, सत्तेचा दुरुपयोग केला, दिशाचे हत्या प्रकरणही बाहेर येईल, बलात्कार कोणी केला ते समजेल

– पंतप्रधानांच्या कामाबद्दल बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही, त्यांनी महाराष्ट्र सांभाळावा, कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणावी, भाषणात कॉमा वापरत नाहीत, फुलस्टॉप वापरत नाहीत

– महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठा राखली, उद्धव ठाकरेंचं भाषण अपवाद ठरले, दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे कसलेही ताळतंत्र नसलेले निर्बुद्ध आणि शिवराळ बडबड, अर्थव्यवस्था, कोरोना यांचा उल्लेखही नाही : नारायण राणे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

प्रकाश आंबेडकर आणि चंद्रकांतदादांची उपस्थिती, काळे कपडे घालून मराठा मूकमोर्चा सुरू

News Desk

“शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक कर्जावरील व्याज परतावा देणे केंद्राने परत सुरु करावे”, मुख्यमंत्र्यांची मागणी

Aprna

मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांचे एका महिन्याचे वेतन पुरग्रस्तांच्या मदतीसाठी

News Desk