HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप हा मोठा पक्ष आहे, कुणाच्या जाण्याने तो थांबत नाही – देवेंद्र फडणवीस

औरंगाबाद | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश करणार हे निश्चितच केले आहे. यानंतर आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दौऱ्यावर असताना पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर जे आरोप केले त्यावर वक्तव्य केले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मला पक्ष सोडावा लागत असल्याचा आरोप करून भाजपमधून बाहेर पडलेल्या एकनाथ खडसे यांच्यावर फडणवीस यांनी पलटवार केला आहे. पक्ष सोडताना कुणाला तरी व्हिलन ठरवावं लागतं. त्यांनी मला व्हिलन ठरवलं. आता ते जे काही सांगत आहेत. ते अर्धसत्य आहे. त्यामुळे योग्यवेळ येईल तेव्हा मी नक्की बोलेल, असं सूचक विधान करत कुणाच्या जाण्याने पक्ष थांबत नसतो, असा टोलाही फडणवीस यांनी खडसेंना लगावला आहे.

नाथाभाऊंनी राजीनामा दिला हे दुर्देव आहे. त्यांनी राजीनामा दिला नसता तर चांगलं झालं असतं. माझ्याबद्दल त्यांना काही तक्रारी होत्या तर त्यांनी त्या वरिष्ठांना सांगायला हव्या होत्या, असं सांगतानाच मला खडसेंच्या इतर आरोपांवर काहीही बोलायचं नाही. खडसे अर्धसत्य सांगत आहेत, मला त्यावर बोलायचं नाही. अशा परिस्थितीत कुणाला तरी व्हिलन ठरवायचं आहे, त्यांनी मला ठरवलं, असं ते म्हणाले.

पक्षातील एखादा कार्यकर्ता असो की मोठा नेता असो पक्षातून गेल्यावर त्याची निश्चितच झळ पोहोचते. पण भाजप हा मोठा पक्ष आहे. कुणाच्या जाण्याने तो थांबत नाही, असा टोला लगावतानाच जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. जनता भाजपसोबतच आहे, असंही ते म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुम्हाला शेवटचं पाहायचंय”, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यानं पतीला फोन करुन स्वत:वर झाडली गोळी

News Desk

महाड इमारत दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू तर ९ जण बचावले

News Desk

देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालत आहेत? फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये,काँग्रेसची विनंती

News Desk