HW News Marathi
महाराष्ट्र

रावसाहेब दानवे लाटेवर निवडून आले, थोरातांचा भाजपला टोला

मुंबई | काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना रस्त्यावरील आंदोलनाची सवय नाही, असे वक्तव्य करणारे भाजप खासदार रावसाहेब दानवे यांना काँग्रेसकडून आता खरमरीत प्रत्युत्तर देण्यात आले आहे. रावसाहेब दानवे किती रस्त्यावर असतात हे आम्हा सर्वांना माहिती आहे. मुळात ते लाटेवर निवडून आले आहेत. परिणामी त्यांच्याविषयी फार बोलण्याची गरज नाही. याउलट राहुल गांधी हे गरीब माणसांमध्ये मिसळतात, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

बाळासाहेब थोरात यांनी हाथरस बलात्कार प्रकरणावरुन भाजपला चांगलेच धारेवर धरले आहे. मुलींवर होणारा अन्याय हा देश सहन करु शकत नाही. सगळ्यांच्या भावना तीव्र आहेत. समाज उत्स्फुर्तपणे रस्त्यावर येत असताना भाजपची भूमिका संशयास्पद आहे. भाजपचे आमदार केवळ संस्कृतीच्या गप्पा मारतात. हाथरसमध्ये ज्या मुलीवर अत्याचार झाले, ती संस्कारित नव्हती का? ज्या मुलांनी तिच्यावर अत्याचार केले, ते संस्कारित होते का, असा सवालही यावेळी बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येणार, उद्धवचा काळ संपला”!

News Desk

‘वंचित बहुजन आघाडी’च्या दोन माजी आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

अहमदनगर दुहेरी हत्याकांड प्रकरणी दोघांना अटक

swarit