HW News Marathi
महाराष्ट्र

अखेर मराठा विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

मुंबई | वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत नाराज मराठा समाजातील विद्यार्थ्यींचे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी काल (२० मे) स्वाक्षरी केली. यानंतर मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे गेल्या १५ दिवसांपासून आझाद मैदानात सुरु असलेले आंदोलन अखेर मागे घेतले आहे.

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून प्रवेश मिळावा. यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर विद्यार्थ्यांचे आंदोलनास बसले होते. परंतु राज्य सरकारने वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणातील मराठा आरक्षणानुसार झालेले प्रवेश कायम करण्यासाठी काढलेल्या अध्यादेशावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. राज्य सरकारच्या या अध्यादेशामुळे २०१९-२० या वर्षासाठी शिक्षण संस्थांमध्ये पीजी आणि एमबीबीएस प्रवेशात मराठा आरक्षण लागू होणार आहे.

या यंदाच्या वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू न करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही हाच निर्णय कायम ठेवला होता. या निर्णयाविरोधात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केले होते. त्यानंतर राज्य सरकारने अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर शरद पवार म्हणतात…!

News Desk

समीर भुजबळ आणि रुपाली चाकणकर पोलिसांच्या ताब्यात

News Desk

राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का, चित्रा वाघ भाजपमध्ये करणार प्रवेश ?

News Desk