HW News Marathi
महाराष्ट्र

वीज बिलाच्या बाबतीत नागरिकांना ‘बेस्ट’न्युज

मुंबई | लॉकडाऊनच्या काळात वीज बिलांमुळे धडकी भरलेल्या सामान्य ग्राहकांना ‘बेस्ट’ने दिलासा दिला आहे. या ग्राहकांकडून आकारण्यात आलेली जास्तीची रक्कम त्यांना व्याजासहित परत केली जाणार आहे. वसूल केलेली अतिरिक्त रक्कम संबंधित ग्राहकाच्या खात्यावर जमा केली जाणार असल्याचे ‘बेस्ट’कडून सांगण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत काल (३ जुलै) झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

गेल्या काही दिवसांमध्ये बेस्ट, महावितरण, अदानी अशा सर्वच वीज कंपन्यांनी ग्राहकांना वीजेची भरमसाठ बिले पाठवली होती. प्रत्यक्ष वापरापेक्षा जास्त बिल आल्याने अनेकजण संतापले होते. याविरोधात मध्यंतरी महावितरणच्या कार्यालयात निदर्शनेही झाली होती. परंतु, उर्जामंत्री नितीन राऊत आणि वीज कंपन्यांकडून वाढीव वीज बिलांचे समर्थन करण्यात आले होते.

‘बेस्ट’ने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेतल्यानंतर जादा बिलाची रक्कम परत दिली जाणार आहे. परंतु, अंदाजे बील कमी आलेल्यांकडून प्रत्यक्ष वीज वापरानुसार रक्कम आकारली जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता बेस्टनंतर महावितरण, अदानी पॉवर आणि टाटा पॉवरही नागरिकांना दिलासा देणार का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू; संपूर्ण देशाचे लक्ष

Aprna

शिवस्मारक समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा विनायक मेटेंनी दिला राजीनामा

News Desk

कोरोनासंदर्भात दिशाभूल करणाऱ्या जाहिरातदारांवर कडक कारवाई करणार

swarit